कडक निर्बंधांमुळे मासेमार बांधव संकटात

    16-Apr-2021
Total Views | 73

news _4  H x W:




मुरूड जंजिरा (प्रकाश सद्रे) : कोरोना आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे मासेमारी व्यवसाय आधिक अडचणित आले आहेत. पावसाळी मासेमारी १ जूनपासून बंद होणार आहे. समुद्रात मासळी मिळण्याचे प्रमाणही घटले आहे.


news _3  H x W: 
 

सध्या जी मासळी मिळते त्याला मुंबईत वितरण व्यवस्था नसल्यानें चिंताजनक स्थिती आहे. मासेमारांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.


news _2  H x W:
 
 
आता मासेमारांनी अखेर नौका किनाऱ्यावर ओढून ठेवण्यास सुरुवात केली असून पुन्हा गावाकडे जाण्याची तयारी केली आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईत लीलावासाठी फारसे व्यापारी येत नसून भाव देखील मिळत नाही. त्यामुळे खलाशी वर्ग आणि नाखवा मंडळींना काहीच आर्थिक लाभ होत नाही.
 
 

news _1  H x W:



मुरूडचे मासेमार नाखवा दशरथ मकू, हे अखेर मुंबईतील मासेमारी सोडून मुरूडला काल परतले. नौका किनाऱ्यावर ओढण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. यंदा विचित्र बदलते हवामान आणि कोरोना स्थितीमुळे मासेमारीचे बहुतेक हंगाम वाया गेले असून उदरनिर्वाह ची चिंता यांना भेडसावत असल्याचे दिसून आले.
 



news  1  1 _1  
 


२०१७ पासूनचा ट्यवधी रुपयांचा डिझेल परतावाही मासेमारांना मिळालेला नाही, अशीही व्यथा त्यांनी मांडली आहे. खोल समुद्रातील मासेमारीचे उत्पादन घटले आहे. त्याच प्रमाणे किनाऱ्यावर देखील मासे मिळणे जिकरीचे झाले आहे. समुद्र खाडीच्या पट्ट्यात मिळणाऱ्या मासळीवरच मासेमारांचा उदरनिर्वाह असल्याचे चित्र फिरताना दिसते.
 
 


news  1  1  new`  _1 
शिवाय बाहेरगावाहून आणलेल्या सुख्या मासळीची विक्री करून काहींना गुजराण करावी लागत आहे. २० वर्षांपूर्वी ओली मासळी मुबलक आणि स्वतः मिळत असे, दिवसे गणिक चित्र बदलत गेले आणि मच्चीमार मासळीच्या संकटात सापडल्याचे चित्र आता दिसून येत आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121