देशाला स्वातंत्र्य २०१४लाच ; विक्रम गोखले मतावर ठाम

माध्यमांनी माझ्या भाषणाचा विपर्यास केला : विक्रम गोखले

    19-Nov-2021
Total Views | 197

vikram gokhle_1 &nbs


मुंबई
: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रानौतने 'देशाला खरे स्वातंत्र्य हे २०१४ला मिळाले,' असे वक्तव्य केले होते. यानंतर अभिनेते विक्रम गोखलेंनी देखी तिच्या या वक्तव्याचे समर्थन केले. मात्र, त्यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रात मात्र त्यांच्यावर टीका करण्याचे सत्र सुरु झाले. यावर आता खुद्द अभिनेते विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन टीकाकारांना उत्तर दिले आहे. 'मी माझ्या मतांवर ठाम असून माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला,' असे त्यांनी म्हंटले आहे.
 
 
विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले की, "२०१४ पासून देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले, हे माझे प्रामाणिक मत आहे. मी त्यावर ठाम असून ते बदलणार नाही. मी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केलेला नाही. मूळ भाषणात मी काय बोललो ते दाखवण्यात आलेले नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांची मुलगी नेहा गोखले हीदेखील सोबत उपस्थिती होती. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी मी तिला आणले आहे, असे त्यांनी सुरुवातीलाच सांगितले.
 
 
प्दुहे ते म्हणाले की, "कंगना रणौतने व्यक्त केलेली तिची मते वैयक्तिक आहेत, माझीही वैयक्तिक आहेत. तिने तसे वक्तव्य केले, यामागे तिला तिची काही कारणे असतील. तसेच, मी त्याला दुजोरा दिला, याला माझी काही वेगळी कारणे आहेत. माझी तिची अशी वैयक्तिक ओळख नाही ना आमचा कधी संबंध आला. मात्र, माझी राजकीय अभ्यासाशी ओळख आहे. १८ मे २०१४चा 'गार्डियन' हे वर्तमानपत्र वाचा. त्यामध्ये जे लिहिले गेले आहे, तेच कंगना बोलली आहे. ती काही चुकीचं म्हणाली नाही एवढंच मी म्हणालो. मी त्या मतावर आजही ठाम आहे."
 
 
पुढे ते म्हणाले की, "२०१४ पासून भारताने जागतिक पटलावर सक्षमपणे उभे राहायला सुरुवात झाली. मी तोंडफाटका माणूस आहे. मला ओठ शिवता येत नाहीत. त्यामुळंच माझी कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नाही. गेल्या ३० वर्षांत मला अनेक राजकीय पक्षांचे निरोप आले, पण मी गेलो नाही. माझ्या मूळ भाषणात मी काय बोललो हे दाखवलं गेलेलं नाही. मी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला असं कुणाला वाटत असेल तर 'दे दी हमे आजादी बिना ढाल' हे गीत म्हणताना, ज्यांची अवहेलना झाली त्यांचं काय? तेव्हा आपल्याला शरम वाटली नाही का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

“शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे” ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले, तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल, असा विश्वास उपमख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान, कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते...

सामाजिक संघटन व परिवर्तन हे संघाचे यशस्वी मॉडेल : अनिल जोशी

सामाजिक संघटन व परिवर्तन हे संघाचे यशस्वी मॉडेल : अनिल जोशी

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या यात्रेने हे सिद्ध केले की, सामाजिक संघटन आणि सामाजिक परिवर्तन हे प्रभावी मॉडेल आहे,” असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र, गोवा, गुजरात क्षेत्र बौद्धिक प्रमुख अनिल जोशी यांनी काढले. रा. स्व. संघाचा पश्चिम क्षेत्र स्तरावरील कार्यकर्ता विकास वर्ग-प्रथमचा प्रकट समारोप नुकताच विद्याप्रबोधिनी प्रशालेच्या मैदानावर पार पडला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ‘आर्मस्ट्राँग’ कंपनीचे सहसंस्थापक व कार्यकारी संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121