२५ हजारांचीच रक्कम काढता येणार
नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील आणखी एका बँकेवर आरबीआयने १६ डिसेंबरपर्यंत निर्बंध लावले आहेत. त्यामुळे खातेधारकांना आता २५ हजारांपर्यंतच रक्कम काढता येणार आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. वित्त मंत्रालयातर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी पंजाब महाराष्ट्र कॉ ओपरेटीव्ह बँकेवर ही कारवाई केली आहे.
बीआर अॅक्ट ४५ अंतर्गत आरबीआयच्या विनंतीनंतर मोराटोरिअम लावण्यात आला आहे. मोराटोरियम लागू झाल्यानंतर २५ हजारपेक्षा जास्त रक्कमेचा व्यवहार करता येणार नाही. त्यापेक्षा अधिक व्यवहार करण्यासाठी बँक ग्राहकाला रिझर्व्ह बँकेला विनंती करावी लागणार आहे.
लक्ष्मी विलास बँकेच्या अडचणी २०१९ मध्ये सुरू झाल्या. रिझर्व्ह बँकेने इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्ससह मर्जरच्या प्रस्तावाला खारीज केले होते. सप्टेंबरमध्ये भागधारकांतर्फे सात संचालकांविरोधात मदतान झाल्यानंतर संकटात अडकलेल्या या बँकेला चालवण्यासाठी मीता माखन यांच्या नेतृत्वात तीन सदस्यांची समिती तयार केली होती.