राहुल गांधी माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही : फडणवीस

    16-Dec-2019
Total Views | 101

Veer _1  H x W:

 

मी पण सावरकर ! भाजपचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल 



नागपूर : नागपूर विधिमंडळ अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने 'मी पण सावरकर', अशी टोपी घालून राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. सभागृहाबाहेर झालेल्या या आंदोलनाचे पडसाद सभागृहातही उमटले. भाजपच्या सर्व आमदारांनी मी पण सावरकर अशी टोपी घालून काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव महाराष्ट्राच्या विधीमंडळात घेण्यासाठी कुणाला अडचण आहे का?. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानच्या तुरुंगात देशासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली त्यांचे नाव घेण्यासाठी कुणाची परवानगी घ्यायला हवी का ?" असा सवाल त्यांनी विचारला. सावरकरांचे नाव आणि त्याचा उल्लेख विधानसभा अध्यक्षांनी कामकाजातून काढून टाकण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते गप्प का बसले, सावरकरांबद्दल बोलण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. जोपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा ईशाराही फडणवीस यांनी दिला.

 

शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, शेतकऱ्यांना दिलेले पहिले आश्वासन मुख्यमंत्री पाळू शकले नाहीत. शेतकऱ्यांना त्यांची मदत अद्याप मिळालेली नाही, त्यांच्या तोंडाला पाने पूसण्याचे काम त्यांनी केले त्याचा आम्ही निषेध करतो, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केला.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121