भारतात पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार वाईन बाथ

Total Views | 32



नाशिक (जयदीप दाभोळकर) :
सन बाथ किंवा बाथचे इतर काही प्रकार आपण अनुभवले असतील किंवा आपल्या परिचयाचेदेखील असतील. मात्र, नाशिकमध्ये आयोजित इंडिया ग्रेप हार्वेस्ट, वाईन फेस्टीव्हल २०१८ दरम्यान या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना वाईन बाथचा अनुभव घेता येणार आहे. तसेच यावेळी पर्यटकांना वाईन पेंटिंग व पोर्ट्रेट्स, विनो थेरेपी, वाईनसह कुकिंग, लोकसंगीत, लोकनृत्य, लेझर आणि फॅशन शोसारख्या कार्यक्रमांचादेखील आस्वाद घेता येणार आहे. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचा अनोखा अनुभव पर्यटकांना अनुभवायची संधी महाराष्ट्र पर्यटन विभाग घेऊन आला आहे.

शुक्रवारी नाशिकमधील सह्याद्री फार्म्समध्ये इंडिया ग्रेप हार्वेस्ट, वाईन फेस्टीव्हल २०१८ या फेस्टीव्हलचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे नाशिक व्हॅली वाईन क्लस्टरच्या सहकार्याने ११ मार्चपर्यंत प्रत्येक आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी वायनरी, विनयार्ड आणि कृषी पर्यटन स्थळांवर हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. वाईन बद्दल सामान्यांचा दृष्टीकोन बदलणे, पर्यटनाला चालना देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. दर दोन वर्षांमधून एकदा हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. फ्रान्स, इटली आणि स्पेन तसेच नापा व्हॅलीसारख्या ठिकाणी आयोजित होणाऱ्या महोत्सवाच्या धर्तीवर हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एकूण २० ठिकाणी हा महोत्सव भरवण्यात येणार आहे.

दरम्यान, या महोत्सवात विंचर वाईन पार्क, व्हॅलोन विनयार्ड, झाम्पा ग्रोव्हर, सोना वायनरी, निफा वायनरी, सुला विनयार्ड, सह्याद्री ॲग्रो फार्म, केनसिंग्टन क्लब, शांदोन इंडियासारख्या वायनरी सहभागी होणार आहेत. राज्यातील आणि प्रामुख्याने नाशिकमधील बागायतदार, मनुका उत्पादक आणि वाईन उत्पादकांना या निमित्ताने एक मंच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांसाठी निरनिराळ्या कार्यशाळा, आणि चर्चासत्रेदेखील आयोजित करण्यात आली आहेत.

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.

अग्रलेख
जरुर वाचा
मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

“भारताचे भांडवली बाजारमुल्य सहापटींनी वाढून ११ वर्षांत ७४ लाख कोटी रुपये इतके झाले. भारतावर मोदी सरकारच्या काळात अधिक दृढ झालेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले.”, असे वक्तव्य एनएससीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनातून भांडवली बाजाराची भूमिका अधोरेखित व्हावी या उद्देशाने विकसित भारताचा मार्ग आणि भांडवली बाजाराचे योगदान या विषयावर दि. ९ जून रोजी नवी दिल्ली येथे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते ..

विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे : योगी आदित्यनाथ

विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे : योगी आदित्यनाथ

विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे. राजा सुहेलदेवने २०-२५ हजार सैनिकांसह दीड लाख सैनिक असलेल्या सालार गाझी मसूदचा पराभव केला. त्याला जिवंत पकडले आणि इस्लाममधील नरकाच्या बरोबरीची शिक्षा त्याला देण्यात आली. उत्तर प्रदेशात अशा गाझीच्या नावाने भरणारा मेळाव्याचे नाव बदलून महाराजा सुहेलदेव यांच्या नावाने मेळा भरवण्यास सुरुवात केली", असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. महाराज सुहेलदेव यांच्या विजय दिनानिमित्त मंगळवारी बहराइच येथे आयोजित कार्यक्रमात योगी आदित्यनाथ उपस्थित ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121