उबाठा गट काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध! नरेश म्हस्के यांचा हल्लाबोल
07-Feb-2025
Total Views | 91
मुंबई : उबाठा गट काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध ठरलेली आहे, असा पलटवार खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. संजय राऊतांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
नरेश म्हस्के म्हणाले की, "महाबंडलेश्वर संजय राऊत आम्हाला ॲपेंडिक्स म्हणाले. ते तर पोटात असते. पण आज शिवसेना उबाठा गट काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध ठरलेली आहे. संजय राऊत काँग्रेसच्या झाडावरती बांडगुळाची भूमिका करतात. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेची माहिती संजय राऊत देत होते. किती वाईट अवस्था झालेली आहे? संजय राऊतांना शिपायाचं कामसुद्धा करावं लागतं."
"संजय राऊत आम्हाला ॲपेंडिक्स म्हणतात पण ते तर पोटात असतं. पण आपण उबाठा गटाची मूळव्याध करून ठेवलेली आहे आणि ते कुठे असतं ते मला सांगण्याची गरज नाही. आपण अशा टीका करत असल्यास आम्हालासुद्धा त्या भाषेत उत्तर देता येतं, याची जाण ठेवावी. उबाठा गट संपुर्णपणे रिकामा होणार आहे. उबाठा गटाला घरघर लागली आहे. संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे एवढीच मंडळी आता तिकडे राहणार आहे," असा दावाही त्यांनी केला.