'स्कूल बस'साठी कठोर नियमावली लागू होणार

पालकांना ही द्यावा लागणार बसमधील सीसीटीव्हीचा ऍक्सेस

    26-Feb-2025
Total Views | 13

school bus


मुंबई, दि.२६: प्रतिनिधी 
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कुल बससाठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील एका महिन्यांमध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना या समितीला देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
संपूर्ण राज्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या हजारो स्कूल बस खाजगी संस्थांच्या मार्फत चालविण्यात येतात. या स्कूलबसच्या माध्यमातून अनेक संस्थांचालक पालकांची आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने सोमवार, दि.२४ रोजी परिवहन विभागामध्ये राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. येत्या शैक्षणिक वर्षापासून या स्कूल बसेस साठी नवी नियमावली निश्चित करण्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली आहे. या समितीने पुढील एक महिन्यांमध्ये अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


तसेच या संदर्भात सन २०११ मध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांची मनमानी रोखण्यासाठी मदान समितीने ज्या उपायोजना सुचवल्या होत्या त्या देखील विचारात घेतल्या जाणार आहेत. या सर्वंकश अहवालाच्या अनुषंगाने नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेस साठी नियमावली निश्चित केली जाणार आहे. ज्या स्कूल बस संस्थाचालकांच्या माध्यमातून चालवल्या जातात, त्यासंदर्भातही पालकांकडून अनेक तक्रारी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक वर्षाच्या एकूण कालावधीपैकी १० महिने या स्कूल बसेस विद्यार्थी वाहतूक करतात. परंतु प्रत्यक्षामध्ये पूर्ण वर्षाचे अवाजवी शुल्क एकाच वेळी संबंधितांकडूनया आकारले जाते. त्याचा प्रचंड मोठा आर्थिक बोजा पालकांवर पडतो, जे अत्यंत अन्यायकारक आहे असे अनेक पालकांचे म्हणणे आहे. त्याऐवजी संबंधितस्कूल बस चालकांनीदहा महिन्यासाठीचे विद्यार्थी वाहतुकीचे शुल्क एकाच वेळी न घेता दर महिन्याला स्वीकारावे असे मत पालकांनी व्यक्त केले आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची


पनवेल आणि बदलापूर सारख्या ठिकाणी घडलेल्या घटना या अत्यंत अप्रिय आणि धोकादायक असून विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता प्रत्येक बसमध्ये पॅनिक बटन ,आग प्रतिबंधक स्पिंकलर, जीपीएस यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरा आदी उपकरणे असणे आवश्यक आहे. तसेच, पालकांकडेही बसमधील सीसीटीव्ही कॅमेराचे एकात्मक नियंत्रण असणे आवश्यक आहे. जेणेकरून बसमध्ये भविष्यात विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणतीही अप्रिय दुर्घटना घडणार नाही, या सर्व सुचनांचा विचार करून पाटील समितीने आपला अहवाल सादर करावा अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

“शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे” ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले, तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल, असा विश्वास उपमख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान, कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते...

सामाजिक संघटन व परिवर्तन हे संघाचे यशस्वी मॉडेल : अनिल जोशी

सामाजिक संघटन व परिवर्तन हे संघाचे यशस्वी मॉडेल : अनिल जोशी

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या यात्रेने हे सिद्ध केले की, सामाजिक संघटन आणि सामाजिक परिवर्तन हे प्रभावी मॉडेल आहे,” असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र, गोवा, गुजरात क्षेत्र बौद्धिक प्रमुख अनिल जोशी यांनी काढले. रा. स्व. संघाचा पश्चिम क्षेत्र स्तरावरील कार्यकर्ता विकास वर्ग-प्रथमचा प्रकट समारोप नुकताच विद्याप्रबोधिनी प्रशालेच्या मैदानावर पार पडला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ‘आर्मस्ट्राँग’ कंपनीचे सहसंस्थापक व कार्यकारी संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121