साध्वी ऋतंभरांच्या प्रमुख उपस्थितीत दुर्गा वाहिनी व मातृशक्तीचे 'मानवंदना संचलन'

तब्बल ३ हजार महिला, तरुणी होणार सहभागी

    03-Jan-2025
Total Views | 40
Sadhvi Rutambhara

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या त्रिशताब्दी आणि राणी दुर्गावती जयंतीच्या पंचशताब्दीच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद अंतर्गत दुर्गा वाहिनी व मातृशक्तीच्या वतीने (कोकण प्रांत) 'मानवंदना संचलन' आयोजित करण्यात आले आहे. साध्वी ऋतंभरा ( Sadhvi rutambhara ) यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दि. ५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता राजा शिवाजी विद्यालय, दादर येथे मुख्य कार्यक्रम संपन्न होईल. तत्पूर्वी दुपारी ३ वाजता तब्बल ३ हजार महिला व तरुणींच्या भव्य संचलनातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व राणी दुर्गावती यांना मानवंदना देण्यात येईल.

आजच्या तरुणींनी सक्षम व्हावे आणि आपल्या वीरांगनांचे कार्य समाजापर्यंत पोहोचावे हा या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. दरम्यान विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत उपाध्यक्षा प्रिया सावंत, मातृशक्ति कोकण प्रांत संयोजिका मनिषा भोईर, दुर्गावाहिनी कोकण प्रांत संयोजिका स्वाती भोसले उपस्थित होत्या.

अग्रलेख
जरुर वाचा
गडचिरोलीत एक लाख झाडे तोडणार हे धादांत खोटे! - वनविभागाचे स्पष्टीकरण; पर्यावरणाची हानी भरून काढण्याच्या अटीवरच लोहखनिज प्रकल्पाला परवानगी

गडचिरोलीत एक लाख झाडे तोडणार हे धादांत खोटे! - वनविभागाचे स्पष्टीकरण; पर्यावरणाची हानी भरून काढण्याच्या अटीवरच लोहखनिज प्रकल्पाला परवानगी

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे लोहखनिज प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारे एकावेळी किंवा अनियंत्रित झाडांची कत्तल करण्यास परवानगी दिलेली नसून, पर्यावरणीय हानी कमी ठेवत टप्प्याटप्प्याने काम करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. तसेच नवीन झाडे लावून होणारी हानी भरून काढण्यात येणार आहे, त्यामुळे ‘एक लाख झाडांची कत्तल’ ही माध्यमातून प्रसिद्ध होणारी माहिती वस्तुनिष्ठ बाबींवर आधारित नसून अतिरंजित आणि दिशाभूल करणारी असल्याचा खुलासा वनविभागाने केला आहे. ‘लॉईड’ कंपनी तेथे ११ लाख झाडे लावणार असून, राज्य शासन सुद्धा गडचिरोल..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121