"लोकसभेमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असला तरी..."; संजय राऊतांचं विधान

    20-Sep-2024
Total Views | 57

Sanjay Raut
मुंबई : लोकसभेमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असला तरी विधानसभेच्या आत्मविश्वासासाठी तिन्ही पक्षाने एकत्र काम करावं लागले, असं विधान संजय राऊतांनी केलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीकाही केली. ते शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, "लोकसभेमुळे केवळ काँग्रेसचाच नाही तर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. आता विधानसभेच्या आत्मविश्वासासाठी तिन्ही पक्षाने एकत्र राहून परत काम करावं लागेल. त्यांचा आत्मविश्वास वाढला म्हणून ते काही एकटे लढणार नाही. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? जर कुणाला तो वाढल्यासारखा वाटत असेल तर हा आत्मविश्वास कसा आहे, हा अभ्यासाचा विषय आहे," असा टोला त्यांनी लगावला.
हे वाचलंत का? - पंतप्रधान मोदी आज वर्धा दौऱ्यावर! विविध योजनांचे लोकार्पण करणार  
 
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासंदर्भात सध्या बैठका सुरु आहेत. प्रत्येक जागेवर आमची चर्चा सुरु असून जो पक्ष जी जागा जिंकेल त्याला ती जागा मिळणार आहे, अशी माहितीही संजय राऊतांनी दिली आहे. मविआतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्याय या मूल्याला कृतीत उतरवण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी जनमानसाशी थेट संवाद ठेवला, अशा आ. अमित गोरखे यांना २०२५ सालच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून पहिल्यांदाच कामकाज पाहण्याची संधी मिळाली. या विशेष अनुभवाबरोबरच त्यांनी ‘सरकारची भूमिका’, ‘उपवर्गीकरणाचा मुद्दा’, ‘अस्पृश्यतेचे प्रश्न’, ‘धर्मांतरविरोधी धोरण’ आणि ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दै. ‘मुंबई तरुण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121