"बांगलादेशचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही", बांगलादेशच्या राजकीय उलथापालथीनंतर शेख हसीना यांच्या मुलाचे वक्तव्य

    06-Aug-2024
Total Views | 59

Sajeeb Wazed
 
ढाका (Sheikh Hasina Resign) : बांगलादेशात ४ ऑगस्ट रोजी शेख हसीना (Sheikh Hasina Resign) यांना कट्टरवाद्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. असे असले तरीही बांगलादेशातील हिंसाचार थांबायचे नाव घेत नाही. यासर्व प्रकरणानंतर शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बांगलादेशचा पाकिस्तान व्हायला पार वेळ लागणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. त्यानंतर त्यांनी एका माध्यमाला मुलाखत देताना त्यांनी बांगलादेशातील अराजकतेसंदर्भात माहिती दिली आहे. 
 
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत वाजेद म्हणाले की, बांगलादेशात सध्या भयावह परिस्थिती आहे. सध्या बांगलादेशमध्ये अराजकता असून कायद्याचे राज्य नाही. जमाव रस्त्यावर फिरत आहेत, घरांच्या कारखान्यांची तोडफोड होत आहे. मी ऐकलं आहे की अल्पसंख्यांक लोकं ही हिंदूंच्या घरांवर आणि मंदिरांवर हल्ले करत असल्याचे वाजेद म्हणाले.
 
त्यानंतर वाजेद यांनी आपली आई शेख हसीना यांच्या प्रकृतीवर भाष्य केले. हसीना यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्या खूपच दु:खी आहेत. त्यांनी बांगलादेशात खूप विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, बांगलादेश आता दुसरा पाकिस्तान होईल अशी चिंता वाजेद यांनी व्यक्त केली आहे. शेख हसीना ७७ वर्षांच्या आहेत. त्यांना पुन्हा राजकारणात यायचे नसल्याचे वाजेद यांनी म्हटले आहे.
 
तसेच वाजेद यांनी आपल्या राजकारणातील प्रवेशावर देखील भाष्य केले. त्यांनी त्याच्या राजकीय प्रवेशाबाबत पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या भविष्यकाळात राजकारणात येण्याचा कोणताही विचार नसल्याचा वाजेद यांनी सांगितले आहे. त्यानंतर बांगलादेशी हिंदूंवर आणि धर्मस्थळांवर झालेल्या हल्ल्याचा आणि शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्यावर केलेल्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी आपली आई शेख हसीनांनी बांगलादेशच्या विकासकार्यात दिलेल्या योगदानावर भाष्य केले. शेख हसीनांनी बांगलादेशातील विकासाचा कायापालट केला. यामुळे शेख हसीनांचा राजकीय कार्यकाळ हा सुवर्ण काळ मानला जाईल, असेसते म्हणाले आहेत.
 
यावेळी बोलत असताना वाजेद यांनी आंतरराष्ट्रीय समुदायावर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय समुदयाने प्रत्येक मुद्द्यावरून बांगलादेशला टार्गेट केले होते. बांगलादेशात अल्पसंख्यांकांची हत्या होताना दिसेल, या लोकांना हेच अपेक्षित होते असे ते म्हणाले असून त्यांनी शेख हसीना यांच्या भविष्याबाबतही सांगितले.
 
शेख हसीना आपल्या कुटुंबासोबत, आपल्या नातवंडांसोबच वेळ घालवणार आहेत. त्या काही दिवस बहिण, मुली-मुलांसोबत वेळ घालवणार आहेत. वाजेद यांनी अंतरिम सरकारबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हे सरकार कुठेच दिसत नाही आणि कोणते कामही करणार नसल्याचे सांगितले.
 
दरम्यान वाजेद यांनी सोशल मीडियावर एक X अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. बांगलादेशमध्ये सध्या जे काही सुरू आहे. यासाठी लोकंच जबाबदार आहेत. तसेच यापुढील सर्व त्यांचीच जबाबदारी आहे, असे वाजेद यांनी व्हिडीओद्वारे सांगितले आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121