...तर उद्धव ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील : चंद्रशेखर बावनकुळे
31-Jul-2024
Total Views | 49
मुंबई : देवेंद्र फडणवीसांचं राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शंभर जन्म घ्यावे लागतील, असा खोचक टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याविरोधात षडयंत्र रचून त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी जंगजंग पछाडलं. पण मायबाप जनतेच्या आशीर्वादानं उद्धव ठाकरे देवेंद्रजींना तुरुंगात टाकू शकले नाहीत. पंतप्रधान @narendramodi जी यांच्या वर तर टीका करण्याची…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 31, 2024
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याविरोधात षडयंत्र रचून त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी जंगजंग पछाडलं. पण मायबाप जनतेच्या आशीर्वादानं उद्धव ठाकरे देवेंद्रजींना तुरुंगात टाकू शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर तर टीका करण्याची ठाकरेंची यांची पात्रताही नाही. त्यामुळे घाम फोडण्याची त्यांची भाषा हास्यास्पद आहे."
"उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला, तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न केला. आता त्यांना संपविण्याची अहंकारी भाषा करताहेत, पण त्यांनी लक्षात ठेवावं, तुमचा हाच अहंकार जनता जनार्दन संपविल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्रजींच्या पाठीशी जनता आहे, परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. त्यांचं राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शंभर जन्म घ्यावे लागतील," असा टोलाही त्यांनी लगावला.