हौसेने घरी आणलेले महाभारताचे ग्रंथ अमिताभ बच्चन यांनी लायब्ररीला दिल; कारण...

    12-Jul-2024
Total Views | 42

kalki  
 
 
मुंबई : नाग अश्विन दिग्दर्शित कल्की २८९८ एडी या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पडूकोण आणि कमल हासन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. महाभारतातील कुरुक्षेत्राचे युद्ध ते कल्कि अवतार या भोवती चित्रपटाचे कथानक फिरते. दरम्यान, कथाच महाभारतावर आधारित असून अमिताभ बच्चन यांनीही घरात महाभारताचे ग्रंथ हौसेपोटी आणले होते. पुढे हे ग्रंथ त्यांनी लायब्ररीला दान केले आहेत.
 
अमिताभ बच्चन सोशल मिडियावर सक्रिय असतात. त्यांनी सोशल मिडियावर ब्लॉगच्या माध्यमातून महाभारताची पुस्तकं घरात का ठेवत नाहीत, याचा खुलासा केला आहे. 'कल्कि' चित्रपटात काम करण्याच्या निमित्ताने पौराणिक कथांबद्दल बिग बींच्या मनात रुची निर्माण झाली. पौराणित कथांमध्ये कल्किचा जन्म आणि ब्रम्हांडाची उत्पत्ती याविषयी सविस्तर माहिती आहे.
 
अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, "आपल्या पुराणात ज्या गोष्टी आहेत त्यामुळे माझ्यासारख्या अशिक्षित माणसांना शिक्षित व्हायला मदत होते. त्यामुळे अनेक व्यक्तींना मूल्यांची शिकवण मिळते. ज्ञान मिळवण्यासाठी मी महाभारतावर आधारीत ग्रंथ मागवले होते. परंतु या पुस्तकांना घरामध्ये ठेवत नाहीत. त्यामुळे मी महाभारतावरील पुस्तकं लायब्ररीला दिली. महाभारत घरात ठेवल्यावर कुटुंबातील लोकांमध्ये मतभेद आणि वाद निर्माण होतात, म्हणून महाभारत घरात ठेवत नाहीत असं म्हटलं जातं." असा खुलासा बिग बींनी केला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
१४ ऑगस्ट २०२५ रोजी दादर स्टेशनवरून ०१०२७ रोजी चार्टर्ड सेकंड एसी कोचद्वारे अयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा

१४ ऑगस्ट २०२५ रोजी दादर स्टेशनवरून ०१०२७ रोजी चार्टर्ड सेकंड एसी कोचद्वारे अयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा

या टूरमध्ये काशी विश्वनाथ मंदिर, रामजन्मभूमी, हनुमान गढी, त्रिवेणी संगम आणि इतर पर्यटन स्थळे समाविष्ट केली जातील भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी 'नवरत्न' सार्वजनिक उपक्रम, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने चार्टर्ड कोचद्वारे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा सुरू करून आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याची आपली वचनबद्धता सुरू ठेवली आहे. ही विशेष तीर्थयात्रा १४ ऑगस्ट २०२५ रोजी दादरहून निघणाऱ्या भारतातील तीन सर्वात आदरणीय शहरे - वाराणसी, अयोध्या आणि प्रयागराज ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121