हौसेने घरी आणलेले महाभारताचे ग्रंथ अमिताभ बच्चन यांनी लायब्ररीला दिल; कारण...
12-Jul-2024
Total Views | 42
मुंबई : नाग अश्विन दिग्दर्शित कल्की २८९८ एडी या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पडूकोण आणि कमल हासन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. महाभारतातील कुरुक्षेत्राचे युद्ध ते कल्कि अवतार या भोवती चित्रपटाचे कथानक फिरते. दरम्यान, कथाच महाभारतावर आधारित असून अमिताभ बच्चन यांनीही घरात महाभारताचे ग्रंथ हौसेपोटी आणले होते. पुढे हे ग्रंथ त्यांनी लायब्ररीला दान केले आहेत.
अमिताभ बच्चन सोशल मिडियावर सक्रिय असतात. त्यांनी सोशल मिडियावर ब्लॉगच्या माध्यमातून महाभारताची पुस्तकं घरात का ठेवत नाहीत, याचा खुलासा केला आहे. 'कल्कि' चित्रपटात काम करण्याच्या निमित्ताने पौराणिक कथांबद्दल बिग बींच्या मनात रुची निर्माण झाली. पौराणित कथांमध्ये कल्किचा जन्म आणि ब्रम्हांडाची उत्पत्ती याविषयी सविस्तर माहिती आहे.
अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, "आपल्या पुराणात ज्या गोष्टी आहेत त्यामुळे माझ्यासारख्या अशिक्षित माणसांना शिक्षित व्हायला मदत होते. त्यामुळे अनेक व्यक्तींना मूल्यांची शिकवण मिळते. ज्ञान मिळवण्यासाठी मी महाभारतावर आधारीत ग्रंथ मागवले होते. परंतु या पुस्तकांना घरामध्ये ठेवत नाहीत. त्यामुळे मी महाभारतावरील पुस्तकं लायब्ररीला दिली. महाभारत घरात ठेवल्यावर कुटुंबातील लोकांमध्ये मतभेद आणि वाद निर्माण होतात, म्हणून महाभारत घरात ठेवत नाहीत असं म्हटलं जातं." असा खुलासा बिग बींनी केला.