अमरनाथ यात्रेच्या यात्रेकरूंची रेकॉर्डब्रेक नोंद; दहा दिवसांत ओलांडला दोन लाखांचा टप्पा!

    10-Jul-2024
Total Views | 42

Amarnath Yatra

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
अमरनाथ यात्रेकरीता (Amarnath Yatra) येणाऱ्या यात्रेकरूंनी दहा दिवसांत दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी ४.७ लाख यात्रेकरूंनी श्री अमरनाथ यात्रा केली होती. दि. २९ जून पासून सुरू झालेल्या या ५२ दिवसांच्या यात्रेचा समारोप १९ ऑगस्टला होत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी, तब्बल २४,८७९ यात्रेकरूंनी यात्रा काढली आणि वार्षिक तीर्थक्षेत्रातील बाबा अमरनाथचे दर्शन घेतले. त्यांनी नमूद केले की ३,८८० मीटर उंच गुहेला भेट देणाऱ्या यात्रेकरूंची संख्या आता २०७,०१६ वर पोहोचली आहे.

हे वाचलंत का? : रामसेतूचा समुद्राखालील अचूक नकाशा तयार

बुधवारी सकाळी ४६२७ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी जम्मूतील भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्प काश्मीर खोऱ्यात अमरनाथ गुहेच्या तीर्थयात्रेसाठी रवाना झाला. या तुकडीत ३४२२ पुरुष, १०२७ महिला, २६ मुले, १३७ साधू आणि १५ साध्वींचा समावेश होता. दररोज, यात्रेसाठी देशभरातून हजारो यात्रेकरू काश्मीरमध्ये येत आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीर सरकारने यात्रेकरूंच्या सोयीसाठी व्यापक व्यवस्था केली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121