सेबी लवकर बाजार भांडवल मोजण्याच्या पद्धतीत बदल करणार !

काय हे पद्धत जाणून घ्या!

    20-May-2024
Total Views | 69

sebi
 
 
मुंबई: वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार, सेबी आपल्या बाजार भांडवल ( Market Capitalisation) मोजण्याच्या पद्धतीत बदल करण्याची शक्यता आहे. साधारणतः बाजारी भांडवल हे कंपनीच्या ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या बेसिसवर मोजला जातो. यामध्ये सेबी आता (Average Market Capitalisation) या बेसिसवर करण्याची शक्यता आहे. यामध्ये ३१ डिसेंबर ही तारीख बाजार भांडवल मोजण्याच्या प्रणालीत प्रमाण मानली जाऊ शकते. तसेच सेबी आपल्या बाजार भांडवलातील काही तरतुदी (Framework) बदलण्याची शक्यता आहे.
 
या तरतुदी (Listing Obligations and Disclosure Regulations ) या नव्या फ्रेमवर्कवर आधारित असणार आहेत. या नव्या तरतुदीत स्वतंत्र महिला संचालक असावी लागणार आहे. ज्यामध्ये कमीत कमी सहा संचालक कंपनीच्या संचालक मंडळात असावे लागतील. याशिवाय कोरम, रिस्क मॅनेजमेंट कमिटी, वार्षिक सर्वसाधारण बैठका, अफवा फेरफार आढावा, लाभांश वितरण धोरण,(वार्षिक सर्वसाधारण सभा) नोंदणीकृत झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत होणे आवश्यक असे काही मुद्दे आवश्यक असण्याची शक्यता आहे.
 
काय असू शकते नवीन पद्धत?

- मार्च ३१ न राहता डिसेंबर ३१ ही प्रमाण तारीख असू शकते.
 
- तसेच Average Market Capitalisation या तरतुदी ऐवजी तारखेच्या आधारे बाजार भांडवलाचे मोजमाप होऊ शकते उदाहरणार्थ जुलै १ ते डिसेंबर ३१ )
 
- ३१ तारखेला बाजार भांडवल ठरवले गेल्यानंतर त्यानंतर तीन महिने अथवा पुढील आर्थिक वर्षाची सुरुवात (जी उशिरा येते) या आधारे ग्राह्य धरत त्यावर LODR निर्बंध ठरू शकतात
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाजार भांडवल मोजण्याच्या नव्या प्रणालीत , LODR पद्धतीमुळे, कंपन्याचे बाजारी भांडवल सतत दैनंदिन दिवशी बदल राहू शकते. त्यामुळे, वाजवी कालावधीत (या प्रकरणात 6 महिने) बाजार भांडवलीकरणाची सरासरी आकडेवारी सूचीबद्ध घटकाचा बाजार आकार आणि परिणामी क्रमवारी, त्याच्या समवयस्कांच्या तुलनेत अचूकपणे प्रतिबिंबित करते. सेबीच्या तज्ञांच्या मताने ' इज ऑफ डुईंग बिझनेस ' यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते.
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121