मुंबई: सरकारच्या मिशन विकसित भारत २०४७ मध्ये खाजगी क्षेत्राचा पण मोठा वाटा असणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत. भारताच्या विकास यात्रेत खाजगी क्षेत्राचेही मोठे योगदान असेल असे सीतारामन 'Annual Business Summit of Industry Chamber Confederation of Indian Industries (CII) या कार्यक्रमात व्यक्त होताना सीतारामन म्हणाल्या आहेत.भारताच्या आर्थिक व कॉर्पोरेट क्षेत्रातील बॅलन्सशीटवर व कामगिरीवर विश्वास असल्याचे सीतारामन म्हणाल्या आहेत.
याविषयी अधिक बोलताना सीतारामन म्हणाल्या आहेत की, 'भारताच्या आर्थिक धोरणांच्या स्थिरतेमुळे आर्थिक व्यवस्थेत वाढ, प्रगती होत आहे. खाजगी क्षेत्रातील योगदानाबद्दल बोलताना सीतारामन म्हणाल्या आहेत की, ' सरकार खाजगी क्षेत्राकडे पाहताना त्यांचे अर्थव्यवस्थतेतील योगदान महत्वाचे मानते. सरकार व खाजगी भागीदारीतून भारत २०४७ पर्यंत विकसित भारत बनेल 'असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
सरकारचे धोरण आखताना आम्ही खाजगी क्षेत्राची मदत अपेक्षित करतो. खाजगी क्षेत्रातील साथ मिळाल्यास सरकार व खाजगी कंपन्या भागीदशतून भारताच्या विकासात भर पडणार आहे. सरकार सुविधा देणारा, व सक्षम करणारा भागीदारी म्हणून काम करेल 'असे प्रतिपादन सीतारामन यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.आम्ही आगामी जुलै महिन्यातील बजेटसाठी तयारी करत असून चर्चा करत असून यावर महत्वपूर्ण सल्लामसलत घेतली जाईल.आम्ही खात्री बाळगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील व पुन्हा सरकार स्थापन झाल्यावर आपले काम पुन्हा जोमाने सुरु होईल.' असे सीतारामन म्हणाल्या आहेत.
भारताच्या विकासाबाबत विश्वास व्यक्त करताना त्या म्हणाल्या, 'जगाच्या विकासात भारताचा ५ वा क्रमांक लागतो. भारताची विकासगाथा ही अनेक कारणांवर आधारित आहे. आयएमएफने भाकीत केल्याप्रमाणे, आर्थिक वर्ष २०२३ पासून ५ वर्ष विकासाची असताना भारत १८ टक्क्यांनी घोडदौड करत असल्याचे सीतारामन म्हणाल्या आहेत.
स्वावलंबन आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी उत्पादन क्षमता वाढविण्याच्या आवश्यकतेवर भर देताना, त्यांनी उत्पादन निर्मितीमध्ये अत्याधुनिकतेचे महत्त्व निदर्शनास आणून दिले आणि या क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.'उत्पादनाला चालना देऊन, भारत देशांतर्गत मागणी अधिक प्रभावीपणे पूर्ण करू शकत नाही तर आयातीवरील अवलंबित्व कमी करू शकतो, अशा प्रकारे स्वावलंबनाकडे प्रगती करू शकतो,' असे सीतारामन म्हणाल्या आहेत.
याशिवाय त्यांनी आपल्या भाषणात पीएलआय ,ग्रीन एनर्जी, अर्थव्यवस्था, पीएसआय योजना, रोजगार निर्मिती अशा विविध मुद्यांवर सीतारामन यांनी भाष्य करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते.