'नॉटी बॉय'द्वारे मिळणार हवामानाचा अचूक अंदाज!

    17-Feb-2024
Total Views | 53
isro launch GSLV-F14/INSAT-3DS Mission

नवी दिल्ली : 
'आदित्य एल १' व 'चांद्रयान ३' यांसारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमा यशस्वी केल्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात (इस्त्रो) नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. इस्त्रो आज दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी 'GSLV-F14' या प्रक्षेपकाच्या मदतीने सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण करणार आहे.


दरम्यान, 'INSAT-3DS' या हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणारा हा उपग्रह या मोहिमेच्या माध्यमातून अवकाशात पाठविण्यात येणार आहे. इस्त्रोच्या माहितीनुसार, आज सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी हा उपग्रह प्रक्षेपकाच्या साहाय्याने अवकाशात झेप घेईल. या उपग्रहाचे वजन २हजार २७४ किलो असणार आहे. 

विशेष बाब म्हणजे 'INSAT-3DS' या उपग्रहास खास टोपणनावदेखील देण्यात आले आहे. सदर उपग्रहास 'नॉटी बॉय' असे टोपणनाव देण्यात आले आहे. एकंदरीत, याच 'नॉटी बॉय'च्या माध्यमातून आगामी काळात देशाला अचूक हवामान अंदाज बांधता येणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121