रिझर्व्ह बँकेची पेमेंट कार्ड नेटवर्कसला नोटीस

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अनाधिकृत बीटूबी व्यवहार करण्यास मनाई

    16-Feb-2024
Total Views |

Visa
 
 
रिझर्व्ह बँकेची पेमेंट कार्ड नेटवर्कसला नोटीस


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अनाधिकृत बीटूबी व्यवहार करण्यास मनाई
 
 
मुंबई: द रिझर्व्ह बँक (आरबीआय)ने सर्व पेमेंट कार्ड नेटवर्कला कंपनीच्या नावाशिवाय पैशाची देवाणघेवाण (ट्रान्स्फर) करण्यास मनाई केली आहे. म्हणजेच बिझनेस टू बिझनेस (बी टू बी) साठी व्यवसायिक विनाओळख पैसे यापुढे पाठवू शकत नाही.आरबीआयच्या माहितीनुसार काही आर्थिक संस्था तिसऱ्या संस्थेकडून पैशांची ' सेटलमेंट ' करत असल्याचे आरबीआयच्या निरिक्षणात आले होते. यामुळे आरबीआयच्या पैसे व्यवहार व ओळखपत्र नियमाचे उलंघन होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
 
आरबीआयने पुढील तपासापूर्वी या पेमेंट कार्ड नेटवर्क कंपनीना व्यवहारांना स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु क्रेडिट कार्डसाठी दैनंदिन व्यवहारात कोणताही अडथळा येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मिडिया वृत्तानुसार या पेमेंट कंपन्यांनी केवायसी अटींचे उलंघन केल्याचा आरोप आरबीआयने केला आहे ‌. पेटीएम पेमेंट बँकेवरील कारवाईनंतर आरबीआयने फिनटेक व कार्ड कंपन्यांबद्दल कडक पवित्रा घेतला आहे.
 
 
बिझनेस पेमेंट सोल्युशन्स प्रोव्हाईडर कंपन्यांचा व्यवहारामध्ये नक्की भूमिका काय आणि त्याची कशी अंमलबजावणी केली जाते याची चौकशी आता आरबीआयकडून होणार आहे. विशेषतः या चौकशीच्या नोटीस विसा, मास्टरकार्ड या नामांकित कंपन्यांना मिळाल्या असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते. मुख्यत्वे अशा प्रकारच्या व्यापारी आवकजावक पेमेंट सेटलमेंट एनईएफटी ,आरटीजीएस प्रणालीतून केली जाते.
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे रेल्वे विभागाला खडेबोल! विचारले... या घटनेची जबाबदारी कुणाची?

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे रेल्वे विभागाला खडेबोल! विचारले... या घटनेची जबाबदारी कुणाची?

मुंब्रा लोकल स्थानकाजवळ ९ जून रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दुर्घटना घडली होती. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लोकलच्या दारात लटकलेल्या प्रवाश्यांच्या बॅगा घासल्यामुळे ६ प्रवाशांचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाला होता. या घटनेवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवार दि. १९ जून रोजी प्रवाशांच्या मृत्यूंबाबत एका जनहित याचिकेवर सुनावणी करत असताना चिंता व्यक्त केली आणि मध्य रेल्वेने मुंबई लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित बंद दरवाजे बसवण्याचा विचार करावा, असा सल्ला दिला...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121