"मनमोहन सिंह यांनी देशाला..." अण्णा हजारे यांचे मोठं वक्तव्यं

    27-Dec-2024
Total Views | 116

Untitled design (3)
 
मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सबंध भारत देश शोकाकुल झाला आहे. सिंह यांनी आपल्या कतृत्वाचा ठसा केवळ भारताच नव्हे तर जगभरात उमटवला होता. अशातच आता भ्रष्टाचार मुक्त आंदोलनाचे प्रनेते आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले मनमोहन सिंग यांनी कायमच देश आणि देशाच्या विकासाला प्राधान्य दिले.
 
मनमोहन सिंह यांच्या कारकीर्दीवर भाष्य करताना अण्णा हजारे म्हणाले की, " जे जन्माला आले आहेत, ते एक दिवस मरणार आहेतच. परंतु काही जणं आपला एक समृद्ध वारसा मागे ठेवून जातात. मनमोहन सिंह यांनी भारताच्या अर्थव्यवसथेला नवीन दिशा दिला." अण्णा हजारे म्हणतात की भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या वेळी पंतप्रधनांनी त्यांना चर्चेसाठी बोलवले होते. मनमोहन सिंह हे त्वरीत निर्णय घेणारे नेते होते. मनमोहन सिंह भ्रष्टाचाराच्या विरोधात होते असे सुद्धा अण्णा म्हणाले. मनमोहन सिंह यांनी नेहमीच देशाचा विचार आधी केला. २००४ ते २०१४ या त्यांच्या कार्यकाळात भारत देश प्रगतीपथावर होता, असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.


   

 
अग्रलेख
जरुर वाचा
चांदवडमध्ये साकारणार अहिल्यादेवींचे शिल्प

चांदवडमध्ये साकारणार अहिल्यादेवींचे शिल्प

“चांदवडचा रंगमहाल ही वास्तू डोळे दिपवणारी आहे. अहिल्याबाई होळकर यांनी महिलांची ताकद ओळखली होती. त्यांनी अनिष्ट प्रथा बंद केल्या. त्यांनी प्रशासक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. 300 वर्षांपूर्वी त्यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व ओळखले होते. अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादनासाठी राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. होळकर साम्राज्याची उपराजधानी असलेल्या चांदवड येथे अहिल्याबाई होळकर यांचे शिल्प साकारण्यात येईल. तसेच, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूंच्या संवर्धनासाठी निधीची..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121