"मनमोहन सिंह यांनी देशाला..." अण्णा हजारे यांचे मोठं वक्तव्यं
27-Dec-2024
Total Views | 116
मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सबंध भारत देश शोकाकुल झाला आहे. सिंह यांनी आपल्या कतृत्वाचा ठसा केवळ भारताच नव्हे तर जगभरात उमटवला होता. अशातच आता भ्रष्टाचार मुक्त आंदोलनाचे प्रनेते आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले मनमोहन सिंग यांनी कायमच देश आणि देशाच्या विकासाला प्राधान्य दिले.
मनमोहन सिंह यांच्या कारकीर्दीवर भाष्य करताना अण्णा हजारे म्हणाले की, " जे जन्माला आले आहेत, ते एक दिवस मरणार आहेतच. परंतु काही जणं आपला एक समृद्ध वारसा मागे ठेवून जातात. मनमोहन सिंह यांनी भारताच्या अर्थव्यवसथेला नवीन दिशा दिला." अण्णा हजारे म्हणतात की भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या वेळी पंतप्रधनांनी त्यांना चर्चेसाठी बोलवले होते. मनमोहन सिंह हे त्वरीत निर्णय घेणारे नेते होते. मनमोहन सिंह भ्रष्टाचाराच्या विरोधात होते असे सुद्धा अण्णा म्हणाले. मनमोहन सिंह यांनी नेहमीच देशाचा विचार आधी केला. २००४ ते २०१४ या त्यांच्या कार्यकाळात भारत देश प्रगतीपथावर होता, असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.