विरुष्काच्या लेकाने गुगलवर केला कब्जा, २०२४मध्ये सर्वात जास्त सर्च केलं गेलं अकायचं नाव

    12-Dec-2024
Total Views | 46
 
virushka
 
 
मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली २०२४ मध्ये पुन्हा एकदा आई-बाबा झाले. अनुष्काने फेब्रुवारीत मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव विरुष्काने अकाय ठेवले. दरम्यान, एकीकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मुलं सोशल मिडियावर फार प्रसिद्ध आहेत. तर अनुष्का आणि विराटने आपल्या दोन्ही मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. ज्यावेळी अनुष्काने आपल्या मुलाचे नाव अकाय असल्याचे जाहीर केले होते त्यानंत सोशल मीडियावर त्या नावाचा अर्थ शोधण्याचा सपाटाच सुरु झाला होता. अकाय विराट कोहलीच्या नावाचा अर्थ गुगलवर इतका शोधला गेला की त्याने २०२४ या वर्षासाठी गुगलच्या सर्चमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. अकाय नावाचा अर्थ हे सर्च गुगलवर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 
तर, मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, अकाय हा तुर्की मूळचा हिंदी शब्द असून हा शब्द कायापासून बनला आहे - ज्याचा अर्थ शरीर असा होतो. तर संस्कृतमध्ये, अकाय म्हणजे 'कोणतीही गोष्ट किंवा अशी वस्तू म्हणजे शरीराशिवायचं रुप. तर त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव वामिका असं आहे. त्यामुळे दोन्ही मुलांची अशी वेगळी नावं ठेवल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण होत आपल्याही मुलांची नावं ती ठेवावीत असा आग्रह केला गेला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं  काय घडलं?

एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं काय घडलं?

(Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. ..

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121