श्रमजीवी एक्स्प्रेस ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात २ दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा

    03-Jan-2024
Total Views | 79
 terrorist
 
लखनौ : न्यायालयाने श्रमजीवी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये करण्यात आलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी बांगलादेशचा रहिवासी हिलालुद्दीन उर्फ हिलाल आणि बंगालचा रहिवासी नफीकुल बिस्वास या दोन्ही दोषी दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली. दि. २८ जुलै २००५ रोजी (२००५ जौनपूर ट्रेन बॉम्बस्फोट) बॉम्बस्फोट प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश कुमार राय यांनी बुधवारी दुपारी ४.१५ वाजता दोन्ही दहशतवाद्यांना सजा सुनावली.
 
सुनावणीच्या वेळी न्यायालय परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. शिक्षा सुनावल्यानंतर दोषींना कडेकोट बंदोबस्तात जिल्हा कारागृहात नेण्यात आले. दोन्ही दहशतवाद्यांना २२ डिसेंबर रोजी दोषी ठरवण्यात आले होते. श्रमजीवी एक्स्प्रेस ट्रेन बॉम्बस्फोटात १४ जणांचा मृत्यू झाला होता, तर ६२ जण जखमी झाले होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121