यंदा शिवाजी पार्क कोण गाजवणार शिंदे की ठाकरे?

    29-Sep-2023
Total Views |

Shivaji Park


मुंबई : गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट आमनेसामने आले होते. या पार्श्वभूमीवर यावर्षी एक महिन्याच्या आधीच दोन्ही गटांकडून शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
 
शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. मात्र, गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्याने शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. यातच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला होता.
 
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार ठाकरे गटाला दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली होती. तर शिंदे गटाकडून बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यात आला होता. या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा चर्चेचा विषय ठरला होता.
 
हा सगळा प्रकार लक्षात घेता यावर्षी दोन्ही गटांकडून महिनाभरापूर्वीच मुंबई महापालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे दोन्ही गट आमनेसामने येणार असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही गटांनी महिनाभरापूर्वीच अर्ज केला असल्याने आता महापालिका कोणाला परवानगी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121