आचार्य अत्रे जयंती निमित्त ठाणे महापालिकेची ‘विचारमंथन व्याख्यानमाला’

    07-Aug-2023
Total Views | 80
TMC VicharManthan On Author Acharya Atre

ठाणे
: मराठीतील अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अत्रे यांच्या जीवनपटाच्या लिखाणाच्या निमित्ताने बोजेवार यांनी अत्रे यांच्या समग्र साहित्याचा, व्यक्तिमत्वाचा सखोल अभ्यास केला आहे. ठाणे महापालिकेच्या ‘विचारमंथन व्याख्यानमाले’तील हे सातवे पुष्प असून हे ‘आचार्य अत्रे यांचे व्यक्तिमत्व आणि विचार’, याविषयावरील हे व्याख्यान शनिवार, १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे.
 
हे व्याख्यान सगळ्यांसाठी खुले आहे. महनीय व्यक्तींचे कार्य व माहिती कळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित केले जाते. या व्याख्यानमालेतील हे सातवे पुष्प असून ठाणेकरांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
 

अग्रलेख
जरुर वाचा
पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा येथे हिंदूंवर आणि पोलिसांवर देखील काही इस्लामिक कट्टरपंथी जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. येथील शिव मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरुद्ध हिंदू समुदायाच्या लोकांनी निषेध केला असता कट्टरपंथींनी मंदिरावरही हल्ला करत मंदिर परिसराची देखील तोडफोड केल्याचे दिसतेय. दरम्यान जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली व परिसरातील दुकाने आणि वाहनांची तोडफोड केल्याचे निदर्शनास येतेय. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे...

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उभा असलेला शिवरायांचा ८३ फूट उंच पुतळा केवळ स्मारक नाही, तर मराठा आरमाराच्या तेजस्वी परंपरेचे जागृत प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर निर्माण केलेले भारतीय इतिहासातील पहिले स्वकीय आरमार, ही केवळ दूरदृष्टी नव्हे, तर सागरी सुरक्षिततेची स्वाभिमानी घोषणा होती. या परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात ‘शिवआरमार’ संग्रहालय उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. बुधवार, दि. ११ जून रोजी त्यास मंजुरी देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121