टोमॅटोतून चांगले उत्पन्न मिळत होते म्हणून शेतकऱ्याची गळा आवळून हत्या!

    14-Jul-2023
Total Views | 267
Robbers kill andhra pradesh farmer

मुंबई
: राज्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडलेले असतानाच एक आश्चर्यकारक घटना आंध्र प्रदेशात घडली आहे. आजवरच्या सर्वाधिक उच्च दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटो उत्पादकांना आर्थिक दिलासा देत असतानाच आंध्र प्रदेशातील टोमॅटो शेतकऱ्याचा नकळतपणे मृत्यू झाला आहे. दरम्यान, चढ्या दरामुळे दोन पैसे जास्त मिळण्याची आशा असताना एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. नरेम राजशेखर रेड्डी असे ६२ वर्षीय शेतकऱ्याची पाळत ठेवत काही लोकांनी ह्त्या केली.

दरम्यान, अय्यामया जिल्ह्यातील नरेम राजशेखर रेड्डी, ६२ वर्षीय शेतकरी दि. १२ जुलै रोजी त्यांच्या गावाच्या बाहेरील भागात मृतावस्थेत आढळून आले. स्थानिक मार्केट यार्डमध्ये टोमॅटो विकून मोठी रक्कम मिळविल्यानंतर दरोड्याच्या प्रयत्नानंतर राजशेखर यांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. शेतकऱ्याने आपला शेतमाल विकून ३० लाखांची कमाई केली होती. तसेच, शेतकर्‍यांच्या अभूतपूर्व उत्पन्नात वाढलेल्या किंमतीमुळे, असामाजिक घटकांच्या गटाने त्यांच्या कमाईवर लक्ष केंद्रित केले, परिणामी अन्नमय जिल्ह्यातील मदनपल्ले मंडलच्या बोदुमल्लादिन गावात टोमॅटो शेतकर्‍यावर खुनी हल्ला झाला.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121