नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक मजबूत होताना दिसत आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यातील भागीदारी दोन्ही देशांसाठीच नव्हे तर जगासाठीही फायदेशीर ठरू शकते. अमेरिका आणि भारत जागतिक पुरवठा साखळीला पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर, स्पेस आणि टेलिकॉम यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर सहमत झाले आहेत. भारत आणि अमेरिकेने जागतिक पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक पुरवठा साखळीत चीनचा सहभाग जास्त आहे. चीनच्या वाढत्या प्रभावाने अमेरिका चिंतेत आहे. त्यामुळे अमेरिका जागतिक पुरवठा साखळी भारतात शिफ्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अमेरिकेसह युरोपीयन देशही चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.