भाजपच्या 'मिशन बारामती'चा पवारांना मोठा धक्का!

पुंरदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

    16-May-2023
Total Views | 219
ashok-devakate-ex-ncp-mla-of-purandar-may-be-join-bjp


पुणे
: भाजपचे मिशन बारामती यशस्वी होताना पाहायाला मिळत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांचे निकवर्तीय मानले जाणारे पुरंदर-हवेलीचे प्रभावशाली माजी आमदार अशोक टेकवडेंनी मुलगा अजिंक्य टेकवडे यांच्यासह राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यांनी आता भाजपाचा हात धरला आहे.टेकवडे यांच्यासोबत एक मोठा गट भाजपात जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या हा निर्णय पुंरदरमध्ये राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे. ते जे.पी.नड्डा ,फडणवीसांच्या उपस्थित भाजपात प्रवेश करणार आहेत.

अशोक टेकवडे हे गेल्या काही दिवसापासून पुरंदरमधील राष्ट्रवादीच्या स्थानिक पक्षीय राजकारणावर नाराज होते. त्यानंतर त्यांनी या संदर्भात वरिष्ठ नेत्याकडे अनेकदा तक्रार केली होती. मात्र, त्यांच्या या तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेली नाही. याशिवाय अशोक टेकवडे यांचा मुलगा सरपंच होऊ नये म्हणून स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच कुरघोडी केली होती. यामुळे देखील टेकवडे नाराज असल्याचे बोलले जात आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121