कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे रिपब्लिकन चळवळ देशभर पोहोचविली - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
15-Apr-2023
Total Views | 44
12
मुंबई : भारतीय दलित पँथर पासून कार्यकर्त्यांचे थवेच्या थवे माझ्या पाठीशी उभे राहिले. कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची चळवळ मी देशभर पोहोचवू शकलो असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथील शिवराज महाविद्यालयात रिपब्लिकन पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दिवंगत मल्लपा कांबळे यांच्या जाहीर श्रद्धांजली सभेत ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत मल्लपा कांबळे;दिवंगत शंकर कांबळे; दिवंगत शिवाजी कांबळे;दिवनगत राम सलवारे ;दिवंगत यशवंत कांबळे या दिवंगत कार्यकर्त्यांची संयुक्त जाहीर श्रद्धांजली सभा घेण्यात आली. या सर्व जुन्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना ना.रामदास आठवले यांनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी किसनराव कुऱ्हाडे; रिपाइं चे प्रा.शहाजी कांबळे; विवेकराव कांबळे; जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे; रूपाताई वायदंडे; मंगळराव माळगे; मधुकर कांबळे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मृत्यू झाल्या नंतर त्यांच्या संयुक्त श्रद्धांजली सभेस उपस्थित राहण्यासाठी ना.रामदास आठवले यांनी अनेक दौरे रद्द करून कोल्हापूर मधील गडहिंग्लज ला पोहोचले.
त्यासाठी मुंबईतुन हैद्राबाद; तिथून बेळगाव आणि बेळगावहुन थेट गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर असा दौरा करून ना.रामदास आठवले हे दिवंगत कार्यकर्त्यांच्या श्रद्धांजली सभेत उपस्थित राहिले. कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आणि कार्यकर्त्यांची जाण असणारे लोकनेते रामदास आठवले आहेत अशी कोल्हापुरात या निमित्त चर्चा झाली.