श्रीराम मंदिरावर हल्ल्याचा कट, पीएफआय कट्टरतावाद्यासह तीनजण ताब्यात

    04-Feb-2023
Total Views | 82
Conspiracy to attack Shriram temple

नवी दिल्ली
: अयोध्येतील श्रीराम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचल्याच्या माहितीवरून एनआयएच्या पथकाने बिहारमधील मोतिहारी येथून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या मुस्लिम कट्टरतावादी संघटनेच्या कट्टरतावाद्याचाही समावेश आहे.

गेल्या महिन्यात ३१ जानेवारी रोजी नेपाळच्या जनकपूर धाममधील गंडकी नदीतील शाळिग्राम शिला पूर्व चंपारणमार्गे अयोध्येत नेण्यात आली. पूर्व चंपारणमधील चकियामार्गे शालिग्राम जात असताना 'अयोध्येत बाबरी मशीद नाही, तर श्रीराम मंदिर होणार नाही', असे सांगूत श्रीराम मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. तसा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

त्यानंतर एनआयएच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने मोतिहारीमध्ये छापेमारी केली आहे. त्यामध्ये एनआयएने कट्टरतावाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई केली आहे. बिहारचे अतिरिक्त पोलिस महासंचालक जितेंद्र सिंह गंगवार यांनी एनआयएने तीन जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये पीएफआयचा कट्टरतावादी रियाझ मारूफचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी पाटणा येथील फुलवारी शरीफ येथे पीएफआय प्रशिक्षण केंद्र चालवल्याप्रकरणी रियाझ मारूफचे नाव समोर आले होते.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121