खानिवडे : वसई विरार महानगरपालिकेतर्फे वसई रोड (पश्चिम)येथील सनसिटी येथे निर्माण करण्यात येणाऱ्या स्मशानभूमीत कबरस्थान ही तयार करण्यात येत असून ती जागा ही हिंदू बहुल असल्याने येथे दफनभूमी निर्माण करण्यात येत असल्याचा निषेध करून हजारोंच्या संख्येने वसई विरारमधील हिंदू बांधवांनी जनआक्रोश मोर्चा काढला होता . दि. २६ फेब्रुवारीला निघालेल्या या मोर्चात महिलांचाही मोठा सहभाग होता. यावेळी जय श्रीराम , वंदे मातरम अश्या घोषणांसह हनुमान चालीसा पठण करण्यात आली. तसेच कबरस्थान विरोधी विविध फलक मोर्चातील सहभागीच्या हातात होते. हा मोर्चा कोणत्याही धर्माविरोधात नसून हा लढा आमची सनातनी सहिष्णुता लक्षात घेऊन महानगरपालिकेने येथे दफन भूमी उभारू नये यासाछी असल्याचे सांगण्यात आले. तसेच लव्ह जिहाद ,लँण्ड जिहाद सहन केले जाणार नाही .
यावेळी हिंदू वस्तीच्या बाजूला दफनभूमी करू नये असे सांगण्यात आले.याविरोधात दफनभूमीची भिंत तोडण्याचा प्रयत्न करून किरकोळ दगडफेक झाली. मात्र माणिकपूर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या दफनभूमी मुळे भविष्यात दोन्ही समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने आत्ताच पालिकेने हिंदू विरहित समाजाची ज्या ठिकाणी वस्ती आहे त्याच्या आसपास त्यांना दफनभूमी निर्माण करून द्यावी जेणेकरून त्यांचा ५ किलोमीटरचा प्रवास वाचू शकतो. दुख्खाच्या क्षणी इतक्या दूर अंतयात्रा काढावी लागल्याने त्यांना भविष्यात त्रास होऊ नये हा सुद्धा आपला हेतू असल्याचे हिंदू संघटनांनी सांगितले.
दफनभूमी च्या वादातातून स्थानिकांचा जनआक्रोश मोर्चा
वसई विरार महानगरपालिका ने केलेल्या दफनभूमी च्या वादातून निघालेल्या मोर्चामध्ये काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत मोर्चात आंदोलन करणाऱ्या लोकांना शांत केले.वसई-विरारमध्ये उभारण्यात आलेल्या दफनभूमी विरुद्धत हा जनआक्रोश मोर्चा स्थानिकांकडून काढण्यात आला आहे.हिंदू वस्तीत दफनभूमी का या प्रश्नांवर हा जनाक्रोशी मोर्चा काढण्यात आला.यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता .