अर्थसंकल्प २०२३ : रेल्वेसाठी २.४० लाख कोटींची भरघोस तरतूद !

    01-Feb-2023
Total Views | 111
नवी दिल्ली : देशाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या रेल्वेसाठी अर्थसंकल्पामध्ये यंदा तब्बल २. ४० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 
Budget 2023 for Indian Railway
 
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये रेल्वेसाठी २०१३ – १४ च्या तुलनेत तब्बल ९ पट अधिक तरतूद करण्यात आल्याचे अर्थंमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. रेल्वेसाठी २.४० लाख कोटी रुपयांची तरतूद ही आतापर्यंतची सर्वोच्च असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच नवीन पायाभूत सुविधा विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे. हायस्पीड ट्रेन लवकरच कार्यान्वित करण्यावरही भर दिला जाणार आहे. नवे रेल्वेमार्ग बांधणे ट्रॅक, सेमी-हायस्पीड वंदे भारत गाड्यांची संख्या वाढवणे, हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या तसेच अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करणे यासाठीही मोठ्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
 
१०० महत्वाच्या प्रकल्पांना प्राधान्य
 
बंदरे, कोळसा, पोलाद, खत आणि अन्नधान्य क्षेत्रासाठी 100 वाहतूक पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्राधान्याने पूर्ण केले जाणार आहेत. त्यासाठी 75,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यापैकी 15,000 कोटी रुपये खाजगी क्षेत्रातून येतील. प्रादेशिक हवाई संपर्क सुधारण्यासाठी 50 अतिरिक्त विमानतळ, हेलिपॅड, वॉटर एरोड्रोम आणि प्रगत लँडिंग ग्राउंड्सचा पुनर्विकास केला जाणार आहे.
 
नागरी पायाभूत सुविधा विकास निधीची स्थापना होणार
 
भविष्याचा विचार करता देशातील शहरांचा विकास करण्यासाठी नागरी पायाभूत सुविधा विकास निधीची स्थापना करण्यात येणार असून त्यासाठी दरवर्षी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
 
भविष्यातील शाश्वत शहरांचा विकास करण्यासाठी याअंतर्गत राज्यांना प्रोत्साहन देण्यात येणरा आहे. नियोजन सुधारणा आणि परिवर्तनासाठी कृती यासाठी जमीन संसाधनांचा कार्यक्षम वापर, शहरी पायाभूत सुविधांचा विकास संक्रमणाभिमुख विकासाला चालना देणे यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121