"अडीच वर्षात झालेली घाण..."; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

    24-Dec-2023
Total Views | 40

Eknath Shinde


मुंबई :
अडीच वर्षात जी घाण झाली आहे ती आम्ही साफ करत आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला आहे. तसेच क्लिन स्वीप होऊ या भीतीने विरोधकांची भंबेरी उडाली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वरळी येथे स्वच्छता मोहिमेची पाहणी करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
 
मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. यातच रविवारी आदित्य ठाकरेंचा मतदार संघ असलेल्या वरळी येथे सुरु असलेल्या स्वच्छता मोहिमेची मुख्यमंत्री शिंदेंनी पाहणी केली. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हेदेखील उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "डीप क्लिन ड्राईव्हमुळे रस्त्यावर असलेली धुळ, माती, डेब्रिज महापालिकेचे कर्मचारी काढत आहेत. रस्ते पाण्याने धुत आहेत. मुंबईत जगभरातील पर्यटक येत असतात. त्यामुळे येथील रस्ते, फुटपाथ, नाले, सार्वजनिक शौचालये हे सगळं स्वच्छ करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मुंबईकरांचं आरोग्य सुदृढ राहावं आणि मुंबई प्रदुषणमुक्त, स्वच्छ आणि निरोगी व्हावी, हे आमचं उद्दिष्ट आहे."
 
"ते सरकार गेलं आणि सरकारबरोबर सगळं गेलं. त्यामुळे अडीच वर्षात जी घाण झाली आहे ती आम्ही साफ करतोय. काही लोकं म्हणतात की, मुंबईची लूट होत आहे. परंतू, मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला ते दरोडेखोर आरोप करत असतील. ही स्वच्छता आम्ही मुंबईकरासाठी करत आहोत. येणाऱ्या निवडणुकीत आपण क्लिन स्वीप होऊ या भीतीने विरोधकांची भंबेरी उडालेली आहे. पण त्यांच्या आरोपांना आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. आमच्या कामाने आम्ही उत्तर देतो," असेही ते म्हणाले आहेत.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121