भरती थांबविण्याच्या जरांगेंच्या मागणीवर विनोद पाटील म्हणतात, "दोन महिन्यांत..."

    03-Nov-2023
Total Views | 272

Vinod Patil


मुंबई : मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत देत आपलं उपोषण मागे घेतलं आहे. यावेळी त्यांनी सरकारला अनेक मागण्या केल्या आहेत. याबाबत मराठा समाज नेते विनोद पाटील माध्यमांशी संवाद साधला.
 
मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत नोकरभरती करु नका, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. याबाबत विनोद पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, यापुर्वी राज्य सरकारच्या भरतीबाबतच्या आलेल्या जाहीराती या प्रत्येक जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या एजंसींना काम दिल्यामुळे कुठे पेपर फुटले, कुठे निकाल फुटला तर कुठे परीक्षेची अडचण आली. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता राज्य सरकारने अनेक परीक्षा स्थगित केल्या आहेत.
 
मग तुम्ही २ तारखेपर्यंत वेळ मागून घेतलाय तर दोन महिने काय फरक पडणार आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, यात छोटासा तांत्रिक मुद्दा येऊ शकतो. दोन महिन्यानंतर काही विद्यार्थ्यांची वयाची मर्यादा उलटू शकते.
 
परंतू, याबाबत जाहिरातीत उल्लेख करता येऊ शकतो की, मागच्या सहा महिन्यांपुर्वी ज्यांची वयोमर्यादा संपत असेल ते यासाठी पात्र असू शकतात. यामुळे कुठलेही नुकसान होणार नाही. विनाकारण गैरसमज करुन घेऊ नका. त्यामुळे नोकरभरती थांबवण्याची ही मागणी रास्त आहे, असेही विनोद पाटील म्हणाले आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा
शिवरायांच्या जागतिक दुर्गगौरावचा आम्हाला अभिमान! गिर्यारोहक, इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केला आनंद.

शिवरायांच्या जागतिक दुर्गगौरावचा आम्हाला अभिमान! गिर्यारोहक, इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केला आनंद.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकाळाचा ऐतिहासीक ठसा उमटलेल्या महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडू येथील १ अशा १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाला. जागतिक वारसा स्थळ समितीचे ४७ वे अधिवेशन दि. ६ जुलै रोजी पॅरीस येथे सुरु झाले असून ते १६ जुलै पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनातंर्गत विविध देशातीरल एकूण ३२ ठिकाणांचे मूल्यांकण व तपासणी केली जाणार आहेत. या मूल्यांकणाची प्रक्रिया शुक्रवारी सुरु झाली असून, २०२४-२५ या कालावधीसाठी भारताकडून मराठा साम्रज्याच्या साम्यर्थ्याचे प्रतिक असणाऱ्..

‘स्वयंपुनर्विकास’ ही ठाणेकरांचीही गरज ‘माझी सोसायटी‘ भावनेतून पालकत्व स्वीकारा भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांची ठाणे जिल्हा बँकेला विनंती

‘स्वयंपुनर्विकास’ ही ठाणेकरांचीही गरज ‘माझी सोसायटी‘ भावनेतून पालकत्व स्वीकारा भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांची ठाणे जिल्हा बँकेला विनंती

स्वयंपुनर्विकास ही ठाणेकरांचीही गरज आहे. लोकप्रतिनिधीनी एकत्र येऊन नागरिकांना ताकद कशी देता येईल त्याचबरोबर ठाणे जिल्हा बँकेने जास्तीत जास्त शिथिलता आणून जास्तीचे कर्ज उपलब्ध करावे. केवळ धोरण आणून चालणार नाही तर सोसायटीला ‘माझी सोसायटी’ या भावनेतून समजून घेत त्यांचे पालकत्व ठाणे जिल्हा बँकेने स्वीकारावे, अशी विनंती भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केली. ते शनिवारी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वतीने स्वयंपुनर्विकासासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121