'मोहम्मद शमीला अटक करू नका', दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना का केली विंनती?

    16-Nov-2023
Total Views | 835
Mohammed Shami

नवी दिल्ली : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दि.१५ नोव्हेंबर २०२३ च्या रात्री न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करून भारताने क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकांमुळे भारताने प्रथम फलंदाजी करत ३९७ धावा केल्या. एकेकाळी डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांच्या खेळीमुळे न्यूझीलंड या धावसंख्येच्या जवळ जाईल असे वाटत होते. पण मोहम्मद शमी नावाच्या वादळाने न्यूझीलंडला २०१९ विश्वचषक उपांत्य फेरीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यापासून रोखले.



शमीने सामन्यात ९.५ षटकात ५७ धावा देत ७ विकेट घेतल्या. न्यूझीलंडचे पहिले चार विकेट मोहम्मद शमीने घेतले. यामध्ये डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांच्या विकेट्सचा समावेश होता. नंतर शतकवीर डॅरिल मिशेल, टिम साऊथी आणि लॉकी फर्ग्युसन यांना बाद करून त्याने विकेट घेण्याचे काम पूर्ण केले.त्यानंतर मोहम्मद शमी त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्या गोलंदाजीचे कौतुक केले असून क्रिकेटप्रेमी पिढ्यानपिढ्या ते लक्षात ठेवतील असे म्हटले आहे. "आजचा उपांत्य सामना काही चमकदार वैयक्तिक कामगिरीमुळे आणखी खास बनला,या सामन्यात आणि विश्वचषकादरम्यान मोहम्मद शमीची गोलंदाजी क्रिकेटप्रेमी येणाऱ्या पिढ्यांसाठी लक्षात ठेवतील. शमी चांगला खेळला.”अशी पोस्ट त्यांनी ट्विटरवर केली.



 
या सामन्यानंतर सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सचा वर्षाव होत आहे. मजेशीर कमेंट्स केल्या जात आहेत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या सामन्यात दिल्ली आणि मुंबईचे पोलीसही सहभागी होण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.मुंबई पोलिसांना X वर टॅग करत दिल्ली पोलिसांनी लिहिले, "आशा आहे की आज रात्रीच्या हल्ल्यासाठी तुम्ही मोहम्मद शमीला अटक करणार नाही." यावर उत्तर देताना मुंबई पोलीस म्हणाले, “दिल्ली पोलीस, तुम्ही असंख्य हृदय चोरल्याच्या गंभीर आरोपांवर गुन्हा दाखल करण्यात अपयशी ठरला आहात. आणि इतर काहींना आरोपी करून देखील.” विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल इत्यादी इतर खेळाडूंकडे मुंबई पोलीस बोट दाखवत होते ज्यांनी या सामन्यात आपल्या कामगिरीने चमक दाखवली. तसेच सर्वसामान्य नागरिकांनी हे भाष्य विनोद म्हणून घ्यावे, असे आवाहन केले.कॉमेंट्रीचा हा सामना इथेच थांबला नाही. त्यानंतर मुंबई पोलिसांचे विशेष आयुक्त देवेन भारतीही त्यात सामील झाले. ते म्हणाले की, असे नाही. त्यांनी लिहिले की, “दिल्ली पोलिस नाही. हे स्वसंरक्षणाच्या अधिकारांतर्गत येते.”



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121