ठाणे : जातनिहाय जनगणनेवरून मतमतांतरे उमटत असतानाच आ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत बहुजनवाद्यांच्या आडुन जातीपातीचे राजकारण सुरु केली आहे. त्यावर नेटकऱ्यानीही " हिंदुमध्ये फुट पाडण्यासाठीच ही टिवटिव असल्याच्या प्रतिक्रिया नोंदवत आव्हाडांना चांगलेच कोलले आहे. पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून विरोधकांकडुन जातीपातीचे राजकारण केले जात असते. यात जितेंद्र आव्हाड नेहमीच आघाडीवर असल्याची टिका होत असते.
आता आव्हाडांनी बिहारमध्ये होत असलेल्या जातीय जनगणनेवर सोशल मिडियात भाष्य केल्याने त्यांचा हिंदु राष्ट्रविरोधी चेहरा समोर आला आहे. त्यांच्यामते जर बिहारमध्ये ओबीसी,एससी आणि एसटी ८४ टक्के असतील, तर भारतामध्ये वेगळे चित्र असूच शकत नाही. असे सांगताना त्यांनी कांशिराम यांचा हवाला देऊन बहुजनांनो एक व्हा! अशी मखलाशी केली. त्यावरून आता नेटकऱ्यानी आव्हाडांची चांगलीच जिरवली आहे. निवडणुका आल्या की हिंदुमध्ये फूट पाडण्यासाठीच अशा प्रकारचे उद्योग सुरु होतात. अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.