मुंबई : आयुष्यभर वारकरी सांप्रदायाचा विचार समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या बाबा महाराज सातारकर यांची २६ ऑक्टोबर रोजी प्राणज्योत मालवली आहे. जेष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे पहाटे ६ वाजता निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी आता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बाबा महाराज सातारकर यांनी अध्यात्म आणि वारकरी सांप्रदायाचा विचार समाजापर्यंत पोहोचवला. ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारा येथे बाबा महाराज सातारकर यांचा जन्म झाला. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य अध्यात्माचा प्रचार प्रसार करण्यात घालवले.
गुरुवारी दुपारी ३ वाजतानंतर बाबा महाराज सातारकरांनी उभारलेल्या नेरुळ जिमखान्यासमोर असलेल्या विठ्ठल रुख्मिणी मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच उद्या सायंकाळी ५ वाजता नेरुळमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. देशभरात आणि देशाबाहेरही त्यांचे कीर्तन प्रसिद्ध आहे. त्यांच्या जाण्याने वारकरी सांप्रदायावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.