मुंबई : भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथे विश्वचषकाचा सामना सुरू आहे. भारताने प्रथम गोलंदाजी करत पाकला बॅटिंगचे आमंत्रण दिले. पाकने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद १९१ धावा केल्या. मोहम्मद सिराज, बुमराह, पंड्या, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
भारताला विजयासाठी फक्त १९२ धावांची गरज आहे. भारत या आव्हानाचा पाठलाग सहजगत्या करेल, यात शंका नाही. सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांचाही पाकविरुध्दचा रेकॉर्ड चांगला असून यासामन्यात त्यांच्याकडून मोठी खेळी केली जाऊ शकते.
दरम्यान, भारताने आजवरच्या इतिहासात पाकिस्तान संघाला एकदिवसीय विश्वचषकात पराभूत केले आहे. पाकिस्तान संघाला भारताविरुध्द एकदाही विजय मिळविता आला नाही. त्यामुळे भारताचा पाकिस्तानविरुध्दचा रेकॉर्ड अबाधित राहील. आतापर्यंत वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध नेहमीच अजिंक्य राहिली आहे.
भारत-पाक सामन्यांची आकडेवारी
भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०४ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. पाकिस्तानने ८८ सामने जिंकले तर भारताने ७३ सामने जिंकले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, २०१० ते २०२० या कालावधीत उभय पक्षांनी खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये भारताने १० जिंकले. एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही पक्ष १३४ वेळा आमनेसामने आले आहेत ज्यात पाकिस्तानने ७३ आणि भारताने ५६ जिंकले आहेत. २०१३ पर्यंत खेळल्या गेलेल्या १७ द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने ११ जिंकले तर भारताने फक्त पाच जिंकले.