संवर्धन शहरी मधमाश्यांचे

    11-Jul-2022
Total Views |
Bees1
 
 
 
 
 
 
प्रवास करायला कुणाला नाही आवडत? कुणी नवी जागा बघायला प्रवास करतो, कुणी ऐतिहासिक वास्तू बघायला, कुणी ठिकठिकाणचा निसर्ग बघायला, तर कुणी मोठ मोठी हॉटेल्स. मात्र, आज आपण जाणून घेणार आहोत, एका अशा अनोख्या प्रवासाची गोष्ट जो चक्क मधमाशीच पोळं वाचवण्याकरिता केला गेला. त्याचाच हा आढावा...
 
 
मधमाशीचा मित्र म्हणून ओळखले जाणारे ठाणे येथील मधमाशीपालक, संवर्धक (श्री सुगंधा चंद्रकांत तरे) यांनी वलसाड येथील धरमपूर गावात नुकतेच एक मधाचे पोळे ‘रेस्क्यू’ केले. त्याकरिता वलसाड- धरमपूर येथील ‘श्रीमद राजचंद्र मिशन आश्रमा’तून खास बोलावणे आले होते, याचे कारण म्हणजे संपूर्ण वलसाडमध्ये मधमाशांना इजा न पोहोचवता पोळ्याची व्यवस्था करून देणारी कुठलीच यंत्रणा नाही की तत्सम व्यक्ती नाही. ज्या आश्रमात हे पोळे लागले होते, तेथील माणसं अतिशय धार्मिक स्वभावाची होती. त्यांना त्या मधमाशांना हानी पोहोचवायची नव्हती. तेथील एका जबाबदार महिला सेवेकरींना समाज माध्यमावरील एका व्हिडिओवरून श्री यांच्या कामाविषयी माहिती मिळाली त्यामुळे त्यांनी श्री सरांना तिथे येऊन मधमाशांना सुरक्षितपणे तिथून हलवण्याची विनंती केली.
 
त्यानुसार ते मुंबईहून प्रवास करत वलसाडला त्यांच्या आश्रमात गेले अन् तेथील ‘एसी डक’च्या मागील ‘फ्लोरिआ’ जातीच्या मधमाशीचे पोळे माशांना इजा होऊ न देता काळजीपूर्वक काढले व जाळीमध्ये भरलेल्या मधमाशा लांब अंतरावर सोडून दिल्या. असे हे मधुमक्षिका पालक, संवर्धक श्री सर यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. तसेच ‘चंद्र-गंधा एंटरप्रायझेस’ या ब्रॅण्डअंतर्गत ते शुद्ध आणि नैसर्गिक मध, परागकण, मधपोळ्याचे मेण याचा व्यवसायदेखील करतात.
 
तुमचा व्यावसायिक अनुभव कसा आहे, असे विचारले असता श्री म्हणतात, ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यापासून मधमाशांसंबधात जवळपास 25 तरी फोन आले. फक्त एक महिनाभरात हवा इतकी शुद्ध झाली, माणसांचा गच्चीवरचा वावर कमी झाला अन् मधमाशा पोऴं बनवू लागल्या. पण, फक्त ‘लॉकडाऊन’मुळे नाही, तर मार्च-एप्रिल या काळात फुलं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. त्यामुळे मधमाशांना अन्नपुरवठा (परागकण आणि मकरंद) मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. परिणामी, नैसर्गिकरित्या मधमाशा वसाहतीचे विभाजन करतात आणि निसर्गातील पोळ्यांची संख्या वाढते.
बरं. या माशा स्वत:हून माणसांना चावत नाहीत.
 
आपण फुलांच्या वासाचे डिओ, अत्तर वापरतो. त्यामुळे माशा आकर्षित होतात.
या घरी आलेल्या माशा आपण सोयीस्करपणे हलवू शकतो आणि त्यांना न मारता नैसर्गिक अधिवासात पुनर्स्थापित करू शकतो.
थोर वैज्ञानिक आईनस्टाईन यांनी म्हटल्याप्रमाणे, जर पृथ्वीवरून मधमाशा नष्ट झाल्या, तर पुढील चार वर्षांत संपूर्ण मानवजात पण पृथ्वीवरून नष्ट होईल.
 
 
 
Bees
 
 
 
कारण, मानवाला लागणार्‍या अन्नधान्यनिर्मितीत मधमाशांचा ९०-९५ टक्के सहभाग आहे. आपण खात असलेल्या अन्नापैकी एक तृतीयांश अन्न हे मधमाशांनी परागीभवनाच्या माध्यमातून तयार केलेले असते.
दरवर्षी 20 मे रोजी ‘जागतिक मधमाशी दिन’ साजरा केला जातो.
तरी मधमाशांचे महत्त्व लक्षात घेता ‘लॉकडाऊन’मध्ये आपल्याकडे आलेल्या मधमाशा न मारता, पुनर्स्थापित करुन एक सुजाण नागरीक होऊया.
 
आग माशीचं पोळं मात्र प्रचंड मोठ असल्याने ते सहजपणे स्थलांतरित करणे शक्य नसल्याने तिथे धूर करून एकूण एक माशी पळवून लावली जाते, जेणेकरून ती नव्या ठिकाणी जाऊन आपली वसाहत बनवेल. मिळालेल्या माहितीनुसार, जगात मधमाशांच्या 20 हजारांहून अधिक जाती आहेत. त्यापैकी फक्त पाच प्रकारच्या मधमाशा मध बनवू शकतात आणि त्यातल्या फक्त दोन प्रकारच्या मधमाशा आपण पेटीत पाळू शकतो.
 
 
 
Bees3
 
 
 
 
 
 
श्री यांच्या कामाचे स्वरूप
 
माशीचे पोळे स्थलांतरित करताना प्रामुख्याने पुढील गोष्टींचा अंदाज घ्यावा लागतो.
 
1. पोळ्याचे ठिकाण. 2. पोळं कुठल्या जातीच्या माशीचे आहे
 
पोळं जर एखाद्या इमारतीत असेल, तर ते तिथून एका पेटीत भरून जंगलात सोडून दिले जाते. त्यावेळी त्यातील मध काढण्यावर भर दिला जात नाही. परंतु शेतघराच्या आवारात जर हे पोळं असेल, तर ते हाताळणे सोपे जाते. तसेच हे पोळ्याचा प्रकार जसे की, घरामध्ये, इमारतीत अथवा गच्चीवर येणार्‍या माशा पुढील प्रकारे असतात. आग माशी, सातेरी माशी, फुलोरी माशी. त्यांचा प्रकार ध्यानात घेऊन व्यवस्था केली जाते. म्हणजे, सातेरी माशीचे पोळं असेल, तर ते सावधगिरीने काढून एका पेटीमधून फार्मवर हलवता येते. फुलोरी माशी असेल, तर याचप्रमाणे त्यांचे स्थलांतर करून, लाकडाची फांदी तोडून दुसर्‍या शेतामध्ये झाडावरती नेऊन ठेवतात आणि तिथे फुलोरी माशी पुन्हा चांगल्या प्रकारे काम करू लागते.
 
 
 
Bees4
 
 
 
श्री यांनी एका पर्यावरणविषयक एनजीओच्या जंगलातील नर्सरीत काम करताना तेथील महत्त्वाच्या गोष्टी शिकण्याकरिता त्यांनी ‘एमएससी वाईल्ड लाईफ’ चा अभ्यास करून रितसर पदविका घेतलेली आहे. यंदा जागतिक पर्यावरण दिवशी त्यांनी चार पोळी ‘रेस्क्यू’ केली. श्री यांनी काही दिवसांपूर्वी ‘रेस्क्यू’ केलेल्या पोळ्यासंदर्भात गंमतशीर माहिती मिळाली, ती अशी की, ठाणे पाचपाखाडीला एका सोसायटीच्या पिलरवर मधमाशांनी बस्तान मांडले होते. गंमत म्हणजे, त्या पिलरवर एक पोळे काढले की, माशा दोन-तीन दिवसांत दुसरे पोळे तयार करायच्या.
 
कारण, तो पिलर माशांना पोळं तयार करण्यास अतिशय सोयीस्कर होता. त्या परिस्थितीत त्यांनी तेथील लोकांना अंधारात न ठेवता त्या पिलरसंदर्भात पूर्ण कल्पनादिली व कायम स्वरूपी काही उपाययोजना करण्याचा सल्ला दिला. या प्रसंगातून त्यांची प्रामाणिक वृत्ती प्रकर्षाने दिसून येते. हल्ली अशा पद्धतीने वन्यजीवांचा विचार करून काम करणार्‍या व्यक्ती सापडणे दुर्मीळच आहेत. पैशाला दुय्यम स्थान देत अन् मधमाशांचा जीव वाचवत लोकांची समस्या सोडवणार्‍या श्री सुगंधा चंद्रकांत तरे यांना पुढील वाटचालीकरिता मनापासून शुभेच्छा...!
‘चंद्र-गंधा एंटरप्रायझेस’ची उत्पादने
कुठलाही कृत्रिम पदार्थ अथवा रंग न मिसळता फक्त आणि फक्त नैसर्गिक पद्धतीने प्राप्त झालेले मल्टिफ्लोरा हनी, लिची मध, निलगिरी मध, सूर्यफूल मध, राई मध, जांभूळ मध, ओवा मध, तुळस मध, शिसव मध, बाभूळ मध, कडुलिंब मध, सातेरी माशीचा मध, दोन-तीन प्रकारचा एकत्र केलेला मध, बडीशेप मध. अशा प्रकारचे उत्तम मध त्यांच्याकडे अंदाजे 600 ते 1,500 रू. पर्यंत उपलब्ध आहे. तुम्ही ऑनलाईन मागवू शकता किंवा प्रदर्शनात काही ठिकाणी त्यांचे स्टॉल लागतात, तेथूनही खरेदी करू शकता. याबरोबरच परागकण, मेण, गीर गाईचे शुद्ध देशी तूप, गुलकंद, शेवग्याच्या पाल्याची पावडर (यात कॅल्शियम आणि प्रोटिन गुणधर्म आहेत) इत्यादी उत्पादनेसुद्धा विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
 
-कस्तुरी देवरुखकर  
 
अग्रलेख
जरुर वाचा
प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्हयात शुभारंभ;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्हयात शुभारंभ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ 16 जून रोजी पालघर जिल्हयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार डॉ. हेमंत सवरा, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121