मुंबई : "पाठीत खंजीर खूपसून विश्वासघातानं सत्तेत आलेल्या आघाडी सरकारला हे सर्व आमदार निश्चितपणे उत्तर देतील.", असे प्रतिपादन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. शुक्रवार, दि. १० जून राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी विधानभवन परिसरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांमध्ये हायव्होल्टेज ड्रामा सुरु होता. मात्र अखेर शुक्रवारी सर्व आमदार मतदानासाठी विधानभवनात पोहोचल्याचे दिसून आले.
पडळकर म्हणाले की, "भाजपचे तिन्ही उमेदवार निश्चितपणे निवडूण येतील. भाजपला लोकांनी जनादेश दिलेला असताना सुध्दा त्या जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसून हे सरकार विश्वास घातानं सत्तेत आलंय. त्यामुळे महाविकास आघाडीने जो विश्वासघात केला होता. त्याला हे सर्व आमदार निश्चितपणे उत्तर देतील."