पुन्हा गंगा किनारी शव!

देशाच्या बदनामीसाठी केला होता लिबरलांनी याच थिअरीचा वापर!

    20-May-2022
Total Views | 130
UP
  
 
 
वाराणसी: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर वाळूत पुरलेले मोठ्या प्रमाणात मृतदेह पुन्हा आढळून आले आहेत. हे दृश्य कोरोनाच्या काळाची आठवण करून देणारे आहे. यादरम्यान काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडिया संस्थांनी आणि प्रचाराने राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला कोरोनामुळे मृत्यू असे संबोधून बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता.
 
 
 
हे आढळून आलेले डझनभर मृतदेह प्रयागराजमधील फाफामाऊ घाटातील आहेत. येथे मृतदेह दफन केल्यानंतर त्यांच्यावर लाल किंवा गेरू रंगाचे कापड लटकवले जाते. ज्या हिंदू लोकांकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नसतात. त्यांच्याकडून हे केले जाते. पावसाळ्यात गंगा नदीतील पाण्याची पातळी वाढली की, हे सर्व मृतदेह त्यात वाहून जातील, अशी लोकांची धारणा आहे. यानंतर त्यांच्या प्रियजनांना मोक्ष मिळेल. म्हणूनच ते मृतदेह गंगेच्या काठावर तात्पुरते पुरतात. वाळूत समाधी दिल्याने खर्चाचा बोजा आपल्यावर पडत नाही, अशी त्यांची धारणा आहे. कदाचित यामुळेच उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांतील लोक फाफमाऊ घाटावर मृतदेह आणतात.
 
 
 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जगभरातील देशांसोबतच भारतातही त्याचा मोठा परिणाम झाला होता. पण, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी ज्या पद्धतीने हे समाधीस्थळ प्रकाशित करून भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तो स्पष्टपणे अपप्रचार होता. त्या सरकारने आणि अनेक संस्थांनी हिंदू धर्मात मृतदेह दफन करण्याची परंपरा असल्याचे स्पष्ट केले होते, परंतु आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे स्वतःचा प्रचार करत आहेत. कोरोनानंतर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला नाही. राष्ट्रीय हरित लवादने (एनजीटी) आणि जिल्हा प्रशासनाने गंगेच्या काठावर मृतदेह दफन करण्यावर बंदी घातली आहे. असे असतानाही खर्च टाळण्यासाठी आणि परंपरेमुळे लोक मृतदेह वाळूत पुरत आहेत. घाटांवर लवकरच विद्युत स्मशानभूमी बांधली जातील, असे प्रयागराज कॉर्पोरेशनचे आयुक्त रवी रंजन यांनी सांगितले आहे. गंगेच्या किनारी वाळूत मृतदेह पुरू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121