का घेतली तारक मेहतांनी कार्यक्रमातून एग्झिट?

    19-May-2022
Total Views | 159
 
तारक
 
 
 
 
गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून दयाबेन म्हणजेच दिशा वकानी, 'मिसेस.तारक मेहता' ही भूमिका साकारणारी नेहा मेहता यांनी प्रोडक्शन हाउससोबत झालेल्या मतभेदांमुळे मालिका सोडल्या नंतर ‘तारक मेहता’ ही भूमिका साकारणारे शैलेश लोढा देखील आता या मालिकेला रामराम ठोकणार आहेत. सध्याच्या आपल्या ट्रॅकविषयी खूश नाही, तसेच प्रोडक्शनहाउस सोबतदेखील आपल्या शुटींगच्या तारखा व कामाच्या तासांवरून त्यांचे वाद सुरु आहेत, अशी चर्चा ऐकू येत आहे.
 
 
 
एकीकडे मालिकेचे निर्माते असित मोदी म्हणतात की, ‘शैलेश लोढा मालिका सोडणार या बातमीत फारसे तथ्य नाही’ त्याचबरोबर त्यांनी एका इंग्रजी वेबसाईटशी बातचीत करताना स्पष्ट केलं आहे की,''माझ्या मालिकेत सगळे कलाकार गेल्या दहा वर्षांपासून काम करीत आहेत. आणि शैलेश लोढा मालिका सोडत आहेत असं मला सांगितलं गेलेलं नाही किंवा अशी बातमी माझ्या कानावर देखील आलेली नाही. जर मला याविषयी काही कळालं तर मी नक्कीच सांगेन. सध्या आम्ही फक्त आमची मालिका प्रेक्षकांना अधिकधिक कशी आवडेल यावर लक्ष्य केंद्रित करीत आहोत''.
 
 
 
आणखी एका सूत्राकडून कळत आहे की,''गेल्या काही आठवड्यांपासून शैलेश लोढा यांच्यावर एकही ट्रॅक मालिकेत दिसला नाही. कारण त्यांनी काही दिवसांपासून मालिकेसाठी शूटिंग करणं थांबवलं आहे. पण यावरनं हे कन्फर्म सांगू शकत नाही की ते मालिका सोडत आहेत की नाही. पण नक्कीच शैलेश लोढा आणि प्रॉडक्शन हाऊसमध्ये शीतयुद्ध सुरु आहे. ज्यावर शांतपणे बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेव्हा तुम्ही एकाच मालिकेत १० वर्ष काम करता तेव्हा मतभेद होतातच. आणि ही अगदी सर्वसामान्य गोष्ट आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते मतभेद संपणार नाहीत''. त्यामुळे शैलेश लोढा मालिका सोडणार की नाही हे अजून नक्की नाही.
अग्रलेख
जरुर वाचा

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121