दमदार! शानदार ! लगातार ! 'रोहित'सेना सुसाट

भारतीय संघाने जिंकली श्रीलंकाविरुद्धची कसोटी मालिका

    14-Mar-2022
Total Views | 67

criket
 
 
मुंबई : बंगळूरमध्ये झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला २३८ धावांनी पराभूत केले आहे. तसेच, या विजयासह भारताने श्रीलंकेला २-० अशा फरकाने क्लीन स्वीप दिला आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरने पहिल्या डावात ९२ धावांची खेळी तर दुसऱ्या डावात ६७ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर रिषभ पंतला त्याच्या कामगिरीसाठी मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
 
 
भारतीय संघाने श्रीलंकेला विजयासाठी ४४७ धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र श्रीलंकेचा ५९.३ षटकांमध्ये २०८ धावांवर आटोपला. यावेळी श्रीलंकेकडून कर्णधार दिमुख करुणारत्ने सर्वाधिक १०७ धावांची एकाकी झुंज दिली. तर कुसल मेंडिसने ५४ धावा केल्या. याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावात अश्विनने ४, जसप्रीत बुमराहने ३ तर अक्षर पटेलने २ आणि जडेजाने १ विकेट घेतल्या.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121