अमेठी, रायबरेलीतून कॉंग्रेसला हादरा

अमेठीत सपा तर रायबरेलीत भाजप आघाडीवर

    10-Mar-2022
Total Views | 134

UP Election
 
नवी दिल्ली : गेली अनेक वर्ष गांधी घराण्याचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमेठी आणि रायबरेलीत कॉंग्रेस तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे स्वतःच्या घरातच प्रियांका गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्त्वाला नापसंती मिळाल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कॉंग्रेसला हा सर्वात मोठा धक्का आहे.
 
 
काँग्रेसमधून नुकत्याच भाजपमध्ये आलेल्या आदिती सिंह रायबरेलीतून जवळपास २० हजाराहून अधिक मते मिळाली आहेत. तर समाजवादी पक्षाच्या राम प्रताप यादव हे ६ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. तर कॉंग्रेसच्या डॉ. मनीष चोहान यांना जेमतेम २ हजारच मते पडली आहेत.
 
 
तर अमेठीत समाजवादी पक्षाचे महाराजी प्रजापती ८ हजार मतांसहित आघाडीवर आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या भाजपच्या डॉ. संजय सिंह यांना ६ हजारच्या जवळपास मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या कॉंग्रेसच्या आशिष शुक्ला यांना जेमतेम १ हजार मते पडली आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121