१८०० प्रशिक्षणार्थींचं अनिल परब यांच्या घराबाहेर आंदोलन

    07-Feb-2022
Total Views | 157
                                 
anil parab
 
 
 
मुंबई: २०१९मध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली असूनही अद्याप नियुक्ती न दिल्याने संतापलेल्या प्रशिक्षणार्थींकडून आज आंदोलन केले जात आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे येथील घराबाहेर हे आंदोलन करण्यात येते आहे. एसटी महामंडळाकडून २०१९मध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती पण तरीही अद्याप नियुक्ती न मिळाल्याने १८०० प्रशिक्षणार्थी आज अनिल परब यांच्या घराबाहेर पोचले आहेत. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
 
 
एसटी महामंडळाकडून २०१९ मध्ये भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. या भरती होणाऱ्यांमध्ये चालक, वाहक, टेक्निशियन्स, सहाय्यक यांचा समावेश आहे. गेले दोन वर्षे रखडलेली नियुक्ती प्रक्रिया त्वरित पूर्ण केली जावी अशी या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी आहे. त्याचसाठी आज आंदोलन होते आहे. १०० दिवसांतून जास्त काळ चाललेल्या एसटी संपावर अद्याप तोडगा निघाला नाहीये. त्यातच आता या आंदोलनाची भर पडून परिस्थती चिघळण्याची शक्यता आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार ३७१ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले...

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

घोटाळ्यात सापडलेल्या ‘न्यू इंडिया को‑ऑपरेटिव्ह बँके’चे विलीनीकरण सारस्वत बँकेमध्ये येत्या ऑगस्ट‑सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या प्रक्रियेत कोणत्याही गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ देणार नाही. ठाकूर म्हणाले, “सर्व गुंतवणूकदारांना कोणत्याही रकमेचे नुकसान न होता मुलभूत रक्कम मिळेल.” सध्याच्या परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या खात्यातून एकावेळी २५ हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही, त्यांना विलीनीकरणानंतर त्यांच्या पूर्ण रकमेची खात्री दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121