रस्त्याच्या कामात गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही- डॉ श्रीकांत शिंदे

रस्त्याच्या कामात गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही- डॉ श्रीकांत शिंदे

    26-Dec-2022
Total Views | 68


rasta bhommipojan
 
 
 
 डोंबिवली: कल्याण डोंबिवलीत पुढील पावसाळ्य़ार्पयत जास्तीत जास्त रस्ते कॉक्रीटीकरणाचे होतील. एमआयडीसीमध्ये एकाच प्रभागात शंभर कोटींचा निधी दिला आहे. सरकार सर्वसामान्यांसाठी काम करीत आहे. रस्त्याच्या कामात गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि सहन देखील केले जाणार नाही. हे रस्ते सुस्थितीत तयार व्हावेत यासाठी अनेक वर्ष लोक वाट पाहत होते. आता ते रस्ते तयार होत आहेत, असे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.


डोंबिवलीतील 12 रस्त्यांचे भूमीपूजन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे बोलत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, विकास म्हात्रे, राहूल दामले, बाळासाहेबांच्या शिवसेनेतील गोपाळ लांडगे, भाऊ चौधरी, राजेश मोरे, दिपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वनिता राणे आदी मान्यवर उपस्थित होते.


डॉ. शिंदे म्हणाले, वाढती लोकसंख्या पाहता येत्या काळात नागपूरच्या धर्तीवर कल्याण शीळ रोड डबल डेकर करण्याचा प्रस्ताव सादर करणार आहे. कल्याण शीळ रोड पूर्ण रस्ता कॉक्रीट केला आहे. मात्र भविष्यात हा देखील रस्ता कमी पडणार आहे. या उद्देशाने मुख्यमंत्र्यांना नागपूरला जसं डबल डेकर रस्ता केला आहे. हा डबल डेकर रस्ता तयार करताना खाली रस्ता त्यावर फ्लायओव्हर आणि त्यावर मेट्रो केली आहे. तसेच कल्याण शीळ रोडवर देखील करा अशी मागणी केली आहे. कल्याणची मेट्रो ही तळोजार्पयत जाणार आहे. ती जर या ब्रिजबरोबर एकत्र केली तर या ठिकाणी मेट्रोला ही पर्याय होईल. त्याचबरोबर शिळफाटा ते रांजनोली पूर्ण रस्ता असेल ज्याठिकाणी भविष्यात कल्याण डोंबिवलीकरांना ट्रॉफिकचे समस्यांमध्ये जावा लागणार नाही. या दृष्टीकोनातून पुढचा वीस वर्षाचा विचार करून हा रस्ता प्रस्तावित केलेला आहे. तसेच डोंबिवली ते टिटवाळा हा प्रवास तीस मिनिटांच्या अंतरावर आणणारा महत्त्वकांक्षी प्रकल्प कल्याण रिंगरोड आहे. या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून मोठागाव ते दुर्गाडी पूल या टप्प्याच्या कामासाठी एमएमआरडीएकडून तीन बांधकाम कंत्रटदार नेमण्यासाठी निविदा सूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. डोंबिवलीतील मोठागाव ते दुर्गाडी किल्ला हा सुमारे दहा किलोमीटरचा प्रवास एका तासावरून अवघ्या सहा मिनिटावर येणार आहे.


चौकट- राष्ट्रवादीचे ठाणो शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्र्याबद्दल अपमान करत ट्विट केल्याप्रकरणी बाळासाहेबांच्या शिवसेनेने कल्याण डोंबिवलीत विविध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्या होत्या. याप्रकरणी अखेर चार पोलिस ठाण्यात आनंद परांजपे विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत बोलताना आनंद परांजपेनी तीव्र नाराजी व्यक्त करत खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना डॉ शिंदे म्हणाले, आपण एखादी गोष्ट बोलतो तेव्हा त्या गोष्टी विचारपूर्वक बोलल्या पाहिजेत. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपण काही बोलू शकतो पण आपण कोणाबद्दल बोलतोय , कशाबद्दल बोलतोय , क से भाषा वापरतोय याचा ही भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. भान ठेवलं तर लोकांच्या भावनांचा उद्रेक होणार नाही असा टोला परांजपे यांना लगावला आहे.
 

-------------------------------------------------------------
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121