लादेनच्या आश्रयदात्यांनी भारताला शिकवू नये

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले

    16-Dec-2022
Total Views | 62

एस. जयशंकर
 

नवी दिल्ली
: “ओसामा बिन लादेन यास आपल्या देशात आश्रय देऊन त्यास पाळणार्‍यांनी भारताला शिकवू नये,” अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या भारताच्या अध्यक्षतेखाली बोलाविलेल्या बैठकीमध्ये पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी जम्मू - काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यास परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अतिशय सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर देऊन आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पुन्हा एकदा पाकची लक्तरे वेशीवर टांगली.


परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले, “संपूर्ण जग ज्याला अस्वीकार्य मानते, त्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सीमापार दहशतवादाचे प्रायोजक असणार्‍यांनी ही बाब नेहमी लक्षात ठेवावी. ओसामा बिन लादेनला आपल्या देशात आश्रय देऊन त्याला पाळणार्‍यांनी आणि शेजारी देशातील संसदेवर हल्ला करणार्‍यांनी या परिषदेस कोणत्याही प्रकारचा शहाणपणा शिकवू नये,” असेही जयशंकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
अग्रलेख
जरुर वाचा
सिंचन वाढीसाठी मुख्यमंत्र्यांकडून कालबद्ध कार्यक्रम - ३८१ सिंचन प्रकल्पातून ३० लाख ६८ हजार ६७३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

सिंचन वाढीसाठी मुख्यमंत्र्यांकडून कालबद्ध कार्यक्रम - ३८१ सिंचन प्रकल्पातून ३० लाख ६८ हजार ६७३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

सिंचन क्षमता वाढवण्यासाठी राज्यातील ३८१ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून ३० लाख ६८ हजार ६७३ हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे. तर ४५ उदंचन प्रकल्पांच्या माध्यमातून ६२ हजार १२५ मेगावॅट वीज निर्मिती, तर ९६ हजार १९० रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याचे विकासचक्र वेगवान करण्यासाठी सिंचन प्रकल्प आणि उदंचन जलविद्युत प्रकल्पांची कामे कालबध्दरित्या गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. १२ जून रोजी दिले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121