मी मुस्लीम आहे, कोणीही आम्हाला रोखू शकत नाही : गौहर खान

अभिनेत्री गौहर खानचा "समान नागरी संहिता"च्या मागणीला विरोध

    11-Jan-2022
Total Views |

Gouhar Khan
 
 
मुंबई : छोट्या तसेच मोठ्या पडद्यावर सुप्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. तिने 'समान नागरी संहिता' (युसीसी)च्या मागणीला विरोध दर्शवला. उद्योजिका आशा जडेजा मोटवानी यांनी ट्विट केले होते की, "बाहेरच्या दुनियेत हे कोणालामाहिती नाही की, भारतात अजूनही हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे कौटुंबिक कायदे आहेत. हिंदूंना धर्मनिरपेक्ष कायद्याचे पालन करावे लागते." यावेळी गौहर खानने म्हंटले की, "ती मुस्लीम आहे, आणि त्यांच्या अधिकारांवर कोणीही बंधने घालू शकत नाही."
 
 
 
 
 
उद्योजिका आशा जडेजा मोटवानी यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, "भारतातील प्रत्येक नागरिकासाठी समान कायदा म्हणजेच युसीसी लागू करावा. हिंदूंनी धर्मनिरपेक्ष नियमांचे पालन केले पाहिजे. मुस्लिम ४ बायका ठेवू शकतात आणि शरियाच्या नावावर त्यांच्या बायका आणि मुलींच्या शिक्षणावर बंदी घालू शकतात. 'समान नागरी संहिता' सर्व भारतीयांना लागू करणे आवश्यक आहे."
 
 
 
 
त्यांनी केलेल्या या ट्विटला उत्तर देताना अभिनेत्री गौहर खानने म्हंटले की, "मी मुस्लीम आहे आणि कोणतीही संस्था आम्हाला आमचे हक्क मिळवण्यावर बंदी घालू शकत नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष आहे आणि ही लोकशाही आहे. तुमच्यासारखी हुकूमशाही नाही. त्यामुळे तुमच्या अमेरिकन स्टेटसमध्ये आरामात राहा आणि माझ्या देशात द्वेष भडकवणे थांबवा!" असे म्हणत तिने युसीसीला विरोध दर्शवला.
 
 
गौहर खान ही एके काळी अभिनेता कुशल टंडनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण त्यानंतर कुशल टंडनने सांगितले होते की, गौहर खानसोबत नेहमीच धर्मावरून भांडण होत असे. कुशलने धर्मांतर करून मुस्लिम व्हावे, अशी गौहर खानची इच्छा होती. परंतु, त्यांने इस्लाम न स्वीकारल्यामुळे हे नाते तुटले. हे दोघे २०१३मध्ये 'बिग बॉस ७' मध्ये एकत्र आले होते. पण, गौहर खानच्या कट्टरवादी इस्लामिक विचारसरणीमुळे हे नाते तुटल्याचे स्वतः कुशल टंडनने सांगितले होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121