पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांचा प्रपोगंडा अपयशी, देशात ऑगस्टअखेर ६५ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण

एका दिवसात १ कोटी ३० लाख ८४ हजार ३४४ नागरिकांना लस

    01-Sep-2021   
Total Views | 143
modi_1  H x W:

एका दिवसात १ कोटी ३० लाख ८४ हजार ३४४ नागरिकांना लस
 
 
 
नवी दिल्ली, पार्थ कपोले : देशात ३१ ऑगस्टपर्यंत एकूण ६५ कोटी ४७ लाख ६३ हजार ७७२ नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले असून मंगळवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी एका दिवसात एक कोटींहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामुळे ऑगस्टपर्यंत ६० कोटी नागरिकांना लस देण्याच्या भारताच्या मोहिमेविरोधातील पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांचा प्रपोगंडा पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे.
 
 
एका नामांकित अमेरिकी प्रसारमाध्यमाने १९ डिसेंबर, २०२० रोजी एका लेख प्रकाशित केला होता. त्यामध्ये मोदी सरकारने देशातील ६० कोटी नागरिकांचे लसीकरण ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य अतिमहत्त्वाकांक्षी असल्याचे म्हटले होते. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आरोग्य व्यवस्था भक्कम नाही, ग्रामीण भागापर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत. अशा परिस्थितीमध्ये कोरोना संसर्गाच्या दबावामध्ये काम करणार्या यंत्रणेस हे ध्येय साध्य करणे अशक्य असल्याचे म्हटले होते.
युनायटेड किंग्डममधील एका वैद्यकीय विषयांवरील जर्नलनेही भारताची लसीकरण मोहीम चुकीच्या पद्धतीने आखली आहे. त्यामुळे ती अपयशी ठरली असून, त्यामुळे दुसर्या लाटेमध्ये भारतात भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचे जाहीर केले होते.
 
 
जागतिक दर्जाच्या आणखी एका प्रसिद्ध माध्यमातील लेखामध्येही लसीकरण मोहीम अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा दावा केला होता. लेखामध्ये भारताने लसींची मागणी नोंदविण्यास विलंब केला, ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’स अधिक महत्त्व दिल्यामुळे देशात लसीकरणामध्ये अडथळा निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला. त्याचप्रमाणे लसीकरणासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘कोवीन’ या व्यवस्थेमुळेही लसीकरणासाठी नागरिकांना त्रास होत असल्याचा दावा लेखात करण्यात आला होता.
अमेरिकी प्रसारमाध्यमाने ५ मे रोजी भारत जगातील सर्वात मोठा लसउत्पादक असतानाही लसतुटवड्याचा सामना करीत असल्याचे सांगणारा एक लेख प्रकाशित केला होता. त्यामध्ये देशातील लसतुटवड्यामुळे लसीकरण मोहीम अपयशी होईल, असे सांगण्यात आले होते.
 
 
देशातील ६० कोटी नागरिकांना ऑगस्टपर्यंत कोरोनाविरोधी लस देण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली होती. त्यानंतर भारताच्या या लक्ष्याची खिल्ली उडविण्याचे काम अमेरिकेसह पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांनी केले होते. भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतरच परदेशी प्रसारमाध्यमांनी भारतविरोधी वार्तांकनास प्रारंभ केला होता. भारतात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, त्यामुळे लसीकरण मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाल्याचे दावेही करण्यात आले होते. अर्थात, यामध्ये परदेशी प्रसारमाध्यमांना काही भारतीय माध्यमसमूहांचीदेखील मोठी मदत झाली होती.
 
 
 
ऑगस्टपर्यंत ६० नव्हे, ६५ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण ! 
 
केंद्र सरकारने ऑगस्टपर्यंत देशातील ६० कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र, आता ऑगस्टपर्यंत त्याहूनही जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी एका दिवसात १ कोटी ३० लाख ८४ हजार ३४४ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. त्यामुळे भारताने ऑगस्टअखेर एकूण ६५ कोटी ४७ लाख ६३ हजार ७७२ नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. हा आकडा देशातील अनेक पुढारलेल्या देशांच्या एकूण लोकसंख्येच्याही दुप्पट ते तिप्पट आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121