ठाण्यातही पावसाचे बळी ; कळव्यात घरांवर दरड कोसळून ५ जणांचा जागीच मृत्यु

    19-Jul-2021
Total Views | 88

thane_1  H x W:
 

ठाणे : शनिवारपासुन मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी दुपारी अखेर बळी घेतले. कळव्यातील घोलाईनगर डोंगरावर वसलेल्या घरांवर भुस्खलन होऊन दरडी कोसळल्याने पाच जणांचा जागीच मृत्यु झाला. तर अन्य चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले असुन यातील दोघे जखमी आहेत. मृतामध्ये दांपत्यासह तीन मुलांचा समावेश आहे.
 
 
ही दुर्घटना कळवा पूर्वेकडील चर्च रोड, घोलाईनगर येथील दुर्गा चाळीत घडली.घटनास्थळी ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल, पोलीस आणि टीडीआरएफ पथक बचावकार्य करीत आहे. घोलाईनगर परिसरात भूमाफियांनी वनविभाग व स्थानिक प्रशासनाला न जुमानता डोंगर माथ्यावर अतिक्रमण करून झोपड्या उभारल्या आहेत. त्यामुळेच अशा दुर्घटना घडत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. काही वर्षापुर्वी देखील अशीच दुर्घटना घडली होती.
 
 
मृतांची नावे -
 
 
प्रभु सुदामा यादव (४५), पत्नी विद्यावती प्रभु यादव (४०),सिमरन यादव (१०),रविकिसन यादव (१२) आणि संध्या यादव (३)
 
 
जखमींची नावे -
 
 
आंचल यादव (१८) आणि सोना उर्फ प्रिती यादव (५ )
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपो हा महाराष्ट्रातील काही प्रमुख मोठ्या बस आगारांपैकी एक मानला जातो. कोकण, तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या वाहतुकीसाठी पनवेल डेपो महत्वाचा आहे. पनवेल बस डेपोमधून दिवसाला अडीच हजार गाड्या ये-जा करतात. अशा स्थितीमध्ये पनवेल बस डेपोची अवस्था ही फार दयनीय झालेली आहे. अशावेळी पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न मार्गी लागावा याकरिता तात्काळ कार्यवाही करा, तसेच दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावरही तात्काळ कारवाई करा, अशी मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121