सुपरस्टार रजनीकांत हे राजकारणातून बाहेर ; संघटनाही केली बरखास्त

    12-Jul-2021
Total Views | 101

Rajanikanth_1  
 
नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर राजकारणाला पूर्णविराम देत भविष्यातही राजकारणात येईन असे वाटत नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच, त्यांनी आपली ‘रजनी मक्कल मंद्रम’ ही आपली संघटना बरखास्त केले आहे. गेले काही महीने रजनीकांत राजकारणामध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. ते कोणत्या पक्षाला पाठींबा देणार? अशा तर्क- वितर्कांना अखेर पूर्णविराम लागला आहे. त्यांनी एक विधान जाहीर करत ही घोषणा केली आहे.
 
 
रजनीकांत यांनी त्यांच्या रजनी मक्कल मंद्रम या संघटनेच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय जाहीर केला. ‘भविष्यातही आपला राजकारणात येण्याचा विचार नाही, असे रजनीकांत यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले आहे. तसेच आपली रजनी मक्कल मंद्रम ही संघटनाही बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संघटना रजनीकांत नरपनी मंद्रममध्ये किंवा रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठीच्या संघटनेत विलीन होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कोकणचा आर्थिक विकास, शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सरकारने ‘वॉटर ग्रीड’ तयार करावे : आ. प्रविण दरेकर यांची मागणी

कोकणचा आर्थिक विकास, शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सरकारने ‘वॉटर ग्रीड’ तयार करावे : आ. प्रविण दरेकर यांची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी “मराठवाडा वॉटर ग्रीड” संकल्पना मांडली, त्यावर कामही सुरू आहे. वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे ६७ टीएमसी पाणी वीज निर्मितीनंतर बोगद्यातून वशिष्ठ नदीला सोडले जाते आणि हे पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. हे ६७ टीएमसी पाणी जर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला मिळाले, पाईपलाईनद्वारे हे पाणी तिन्ही जिल्ह्यात फिरवले तर कोकणातील पाणीटंचाई कायमची दूर होईल. त्यामुळे मराठवाड्याप्रमाणे कोकणच्या समृद्धीसाठी कोकण वॉटर ग्रीड होणे अत्यंत गरजेचे आहे. कोकणाच्या आर्थिक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121