मुंबईत कायद्याच राज्य आहे की खंडणीखोरांच ?

    04-Feb-2021
Total Views | 150

mns_1  H x W: 0

शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही- मनसे

मुंबई : विरप्पन नि जेव्हढं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधार्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल असे ट्विट दोन दिवसांपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले होते. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत मनसेने शिवसेनेचा मुंबईतील कारनामा उघड करत , मुंबईत कायद्याचं राज्य आहे की खंडणीखोरांच असं म्हणत सडकून टीका केली.
 
मुंबईमध्ये शिवसेनेकडून फेरीवाल्यांकडून खंडणी उकळण केली जातं असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज केला आहे. विक्रोळी या भागात फेरीवाल्यांकडून रोज दहा रुपये घेतले जात आहेत आणि त्याची पावती त्यांना दिली जात आहे त्या पावतीवर बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, यांचे फोटो आहेत तर स्थानिक आमदार सुनील राऊत आणि स्थानिक नगरसेवक उपेंद्र सावंत यांचे ही फोटो आहेत. पोलीस आणि बीएमसी मॅनेज करू अस सांगून ही खंडणी उकळी जात असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. म्हणून यांना विरप्पण गॅंग असं मनसेने म्हटलं होतं आणि काही लोकांना झोम्बलं होत असा टोला ही त्यांनी वरून सरदेसाई यांना लावला.
 
 
आमची मागणी आहे की, खंडणीखोरांना चाप बसला पाहिजे. खंडणीखोरांवर कारवाई व्हायलाय पाहिजे. महानगरपालिकेची लोकं कुणी या खंडणी प्रकरणांमध्ये सामिल आहेत का याची उच्चपदस्थ झाली पाहिजे. अशा खंडणीखोरांच्या हातून मुंबई वाचवणे गरजेचे आहे. चंबळखोरांचं राज्य मुंबईत आलंय की काय ? असा प्रश्न मला कधीकधी पडतो. मला सगळ्यात जास्त दु:ख याचं वाटतंय की, या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो आहे. शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही. मुंबई पोलिसांना भेटून यासंबंधीची सविस्तर तक्रार देणार आहे. पोलिसांनी या खंडणीखोरांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
बांग्लादेशातसूफी परंपरा धोक्यात! कट्टरपंथींचा हैदोस; देशाच्या सांस्कृतिक वारशालाही मोठा धक्का

बांग्लादेशातसूफी परंपरा धोक्यात! कट्टरपंथींचा हैदोस; देशाच्या सांस्कृतिक वारशालाही मोठा धक्का

बांग्लादेशमध्ये सूफीइस्लामशी निगडित पवित्र स्थळांवर इस्लामिक कट्टरपंथींनी हल्ले सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. हे हल्ले इतके भीषण आहेत की १०० पेक्षा जास्त मजार व दर्गे लक्ष्य बनले शेख हसीना यांच्या सरकारचा पडाव झाल्यानंतर या घटना आणखीन वाढल्या. मोहम्मद यांच्या अंतरिम सरकारने अद्याप त्यावर ठोस पावले उचलली नसल्याचे दिसून येत आहे. या हल्ल्यांमुळे केवळ धार्मिक स्थळांचे नुकसान होत नाही, तर देशाच्या सांस्कृतिक वारशालाही मोठा धक्का बसत आहे. शतकानुशतकेबांग्ला संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली सूफी परंपरा आता धोक्यात..

देशाच्या विकासात प्रत्येकाचा वाटा हेच मोठे परिवर्तन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

देशाच्या विकासात प्रत्येकाचा वाटा हेच मोठे परिवर्तन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

"देशातील प्रत्येकजण अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या समाजासाठी आणि विकासप्रक्रियेकरीता आपला वाटा उचलत आहे. हेच आपल्या देशात घडलेले सर्वात मोठे परिवर्तन आहे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. शुक्रवार,दि.१९ रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे ऑर्गनाईसद्वारे आयोजित आणि एनएसईच्या सहकार्याने 'अर्थायम- धार्मिक मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या 'एकात्म मानव दर्शन'च्या ६० व्या वर्षाचे स्मरण करत विचारप्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121