आजपासून राज्यात जमावबंदी ; मुख्यमंत्री म्हणतात...

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने रात्री ९ ते सकाळी ६मध्ये जमावबंदी

    25-Dec-2021
Total Views | 139

Maharashtra_1
 
 
मुंबई : एकीकडे ख्रिसमसचा आठवडा आणि लग्नाचे अनेक मुहूर्त असताना दुसरीकडे राज्य सरकारने मात्र २५ डिसेंबर म्हणून आजपासून संपूर्ण राज्यात जमावबंदी लागू केली आहे. राज्यातील वाढत्या कोविड संसर्गामुळे राज्य सरकारने हे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी विधिमंडळात संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी नव्या नियमावलीची घोषणा केली. यानुसार रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता, आता नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत केंद्र सरकारने व्यक्त केले आहे.
 
 
ओमिक्रॉन विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत, पुढील काळात प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे आहे. ते आताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
 
असे आहेत निर्बंध :
 
 
> संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.
 
 
> लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
 
 
> इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
 
 
> उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
 
 
> क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
 
 
> वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
 
 
> उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
 
 
> याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.
 
 
> जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121